शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

Russia Ukraine War: रशिया-यूक्रेन युद्धात भारतच मध्यस्थी करू शकतो; रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 9:44 PM

दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्याचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत असं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली – यूक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी रशियानं विचारही केला नसेल की हे युद्ध जवळपास महिनाभर चालेल. बलाढ्य रशियानं यूक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर काही दिवसांत यूक्रेन रशियाच्या ताब्यात येईल असं म्हटलं जात होतं. परंतु यूक्रेनच्या नागरिकांचा कडवट प्रतिकार आणि झेलेन्स्की यांचा विश्वास या बळावर यूक्रेननं रशियाला अद्याप थोपवून धरलं आहे. त्यामुळे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचं गणित बिघडलं आहे. त्यात अमेरिकेसह नाटो देश प्रत्यक्षात या युद्धात उतरले नसले तरी त्यांनी यूक्रेनला पाठिंबा देत रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत.

यूक्रेनवर हल्ला करण्याची मोठी किंमत रशियाला चुकवावी लागत आहे. निर्बंधामुळे रशियावर आर्थिक संकट येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आता रशिया यूक्रेनबाबत नरमाईची भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे. यूक्रेनसोबत युद्ध संपवण्यासाठी रशियानं भारतासारख्या मित्राचा पर्याय पुढे आणला आहे. भारताशिवाय अन्य कुणीही रशिया-यूक्रेन युद्धात तडजोड करू शकत नाही. त्यामुळे भारताने युद्धात समोरासमोर आलेल्या देशांमध्ये मध्यस्थीची भूमिका करावी असं रशियानं म्हटलं आहे.

या बदल्यात रशिया आपले भारतासोबतचे संबंध नव्या उंचीवर नेण्याच्या मनस्थितीत आहे. हा बदल विशेषतः व्यावसायिक क्षेत्रात होऊ शकतो. ऐतिहासिकदृष्ट्या दोन्ही देश आपापल्या चलनात व्यापाराला प्रोत्साहन देऊ शकतात (India Russia Trade) रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ही भेट दिली. त्यांना भारताकडून खूप आशा आहेत हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते. यामध्ये व्यवसायापासून युद्धातील सलोख्यापर्यंतच्या अपेक्षा असल्याचं समोर येते. मॉस्को आणि कीव्हमध्ये भारत मध्यस्थी करू शकतो असं रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

 

सर्गेई लावरोव यांचं म्हणणे महत्त्वाचं आहे कारण दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्याचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. त्यांनी भारत हा एक महत्त्वाचा देश आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावू शकतो. या युद्धात भारत तटस्थ राहिला आहे. कोणत्याही टप्प्यावर त्यांनी रशियावर टीका करणे टाळले आहे. आजवर संयुक्त राष्ट्रात रशियाच्या विरोधात जे काही ठराव आले त्यातही भारताने सहभाग घेतलेला नाही. रशियाने भारताच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. भारतावर अमेरिकेच्या दबावामुळे त्यांच्या परस्पर संबंधांवर परिणाम होणार असल्याचं रशियाने स्पष्टपणे नाकारले आहे. भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अतूट असल्याचे लावरोव यांनी म्हटलं आहे. यावर कोणाचाही दबाव चालणार नाही. तसेच युक्रेनमध्ये युद्ध नसून स्पेशल ऑपरेशन असल्याचं रशियानं म्हटलं आहे.

टॅग्स :IndiaभारतRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया