शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

भारताला मिळणार पाकिस्तानी अण्वस्त्र हवेतच नष्ट करणारी S-400 सिस्टीम, रशियाबरोबर अंतिम चर्चा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 12:34 IST

भारताने रशियाबरोबर हवाई हल्ल्यापासून संरक्षण देणा-या एस-४00 मिसाइल सिस्टीम खरेदीचा करार केला आहे. 39 हजार कोटी रुपयांचा हा करार प्रत्यक्षात आणण्यासाठी भारताने रशियाबरोबर अंतिम फेरीची चर्चा सुरु केली आहे.

ठळक मुद्देएस-४00 मिसाइल 400 किलोमीटरच्या टप्प्यातील 30 किलोमीटर उंचीवरुन उड्डाण करणा-या कुठल्याची लक्ष्याचा अचूक भेद करु शकते. 2018-19 आर्थिक वर्षात या करारावर शिक्कामोर्तब करण्याचा भारताचा प्रयत्न आहे.

नवी दिल्ली - भारताने रशियाबरोबर हवाई हल्ल्यापासून संरक्षण देणा-या एस-४00 मिसाइल सिस्टीम खरेदीचा करार केला आहे. 39 हजार कोटी रुपयांचा हा करार प्रत्यक्षात आणण्यासाठी भारताने रशियाबरोबर अंतिम फेरीची चर्चा सुरु केली आहे. एस-४00 ट्रायंफ एअर डिफेन्स मिसाइल सिस्टीमच्या समावेशानंतर भारताची हवाई सुरक्षा अधिक बळकट होईल. एस-४00 मिसाइलचे वैशिष्टय म्हणजे ही सिस्टीम शत्रूने डागलेली क्षेपणास्त्रे,   स्टेल्थ फायटर विमाने तसेच हेर विमाने शोधून हवेतच नष्ट करते. 

एस-४00 मिसाइल 400 किलोमीटरच्या टप्प्यातील 30 किलोमीटर उंचीवरुन उड्डाण करणा-या कुठल्याची लक्ष्याचा अचूक भेद करु शकते. या सिस्टीमुळे भारताला चीन-पाकिस्तानचे हवाई हल्ले सहज परतवून लावता येतील. 2018-19 आर्थिक वर्षात या करारावर शिक्कामोर्तब करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. करारावर अंतिम स्वाक्षरी झाल्यानंतर दोनवर्षांनी ही सिस्टीम भारताला मिळेल.  भारत रशियाकडून एस-400 च्या पाच  सिस्टीम्स विकत घेणार असून क्रूझ क्षेपणास्त्राबरोबर आंतरखंडीय बॅलेस्टीक क्षेपणास्त्रही यातून डागता येऊ शकतात. 

करारानंतर साडेचारवर्षांनी सर्वच्या सर्व पाच सिस्टीम्स भारताला मिळतील. ही सिस्टीम भारताला मिळाल्यानंतर आशिया खंडातील हवाई सुरक्षेची सर्व समीकरणे बदलून जातील असे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. चीनने रशियाकडून आधीच एस-400 मिसाइल सिस्टीम विकत घेतली आहे. रशियाने युक्रेनला लागून असणा-या सीमेवर क्रिमियामध्ये एस-400 सिस्टीम तैनात केली आहेत. 

जगातील अनेक देशांना या मिसाइलमध्ये रस असून टर्की आणि सौदी अरेबियाही रशियाकडून ही सिस्टीम विकत घेणार आहे. युद्ध प्रसंगात भारताला या सिस्टीमचा खूप फायदा होईल. एस-400 ने भारताला पाकिस्तानच्या छोटया पल्ल्याच्या नासर या अण्वस्त्र क्षेपणास्त्राचा हल्ला निष्प्रभ करता येईल. एकूणच एस-400 च्या समावेशाने भारताची हवाई ताकत कैकपटीने वाढणार आहे.                                   

टॅग्स :russiaरशियाIndiaभारतPakistanपाकिस्तान