शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पाकिस्तानच्या राजकारणाला दहशतवादाचा कँसर; एस जयशंकर यांचे थेट भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 23:04 IST

S. Jaishankar on Pakistan : पाकिस्तानच्या कृत्यांमुळे फक्त आपलेच नुकसान होत नाही, तर संपूर्ण उपखंड अस्थिर होत आहे.

S. Jaishankar on Pakistan : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा दहशतवाद्याच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला भरकार्यक्रमात सुनावले. 'पाकिस्तान सतत दहशतवादाला पाठिंबा देतो. या दहशतवाच्या कँसरने पाकिस्तानच्या राजकारणात शिरकाव केलाय. हा त्यांची संपूर्ण राजकीय व्यवस्था खाऊन टाकतोय. पाकिस्तानच्या कृत्यांमुळे फक्त आपलेच नुकसान होत नाही, तर संपूर्ण उपखंड अस्थिर होत आहे. पाकिस्तानने दहशतवादाचा दृष्टिकोन सोडला पाहिजे,' अशी प्रतिक्रिया जयशंकर यांनी दिली.

भारत-चीन संबंधांवर भाष्ययावेळी त्यांनी भारत चीनचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले, भारत आणि चीनचा एकाचवेळी उदय झाल्यामुळे संबंध संतुलित करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पूर्वीच्या आदर्शवादी आणि दिशाभूल धोरणांमुळे सहकार्य आणि स्पर्धेला अडथळा होता, परंतु गेल्या दशकात भारताचा दृष्टिकोन बदलला आहे. 2020 च्या सीमा विवादामुळे संबंध गुंतागुंतीचे झाले, या समस्या सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भारताची ताकद मजबूत करण्यावर भर चीनच्या वाढत्या क्षमतेमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांसाठी भारताला तयार राहण्याची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रीय शक्तीचा जलद विकास होणे आवश्यक आहे. यामध्ये सीमेवरील रचना आणि समुद्राकडे होणारे दुर्लक्ष सुधारावे लागेल. तसेच, संवेदनशील भागातील अवलंबित्व कमी करावे लागेल. भारत आपली एकूण ताकद वाढवण्यावर भर देत आहे. भारताचा दृष्टिकोन परस्पर आदर, परस्पर संवेदनशीलता आणि परस्पर हितावर अवलंबून आहे. भारत-चीन संबंधांच्या दीर्घकालीन विकासाचा केवळ द्विपक्षीय संबंधांवरच नव्हे तर जागतिक व्यवस्थेवरही परिणाम होईल, असेही जयशंकर यावेळी म्हणाले. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादchinaचीन