शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

सचिन तेंडुलकरचा ‘भारतरत्न’ परत घ्यावा

By admin | Published: June 20, 2015 12:54 AM

क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याकडून ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी

जबलपूर : क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याकडून ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी करणारी याचिका मध्यप्रदेश उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने गुरुवारी ही याचिका विचारार्थ मंजूर केल्यामुळे सचिन कायद्याच्या डावपेचात अडकला आहे.भोपाळचे रहिवासी व्ही. के. नस्वा यांनी ही याचिका दाखल केली आहे. सचिन तेंडुलकर एक जगप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू आहे. क्रिकेट जगतात त्यांनी अनेक जागतिक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. मात्र ते देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा व्यावसायिक उत्पादनांच्या जाहिरातींसाठी वापर करीत असून बक्कळ पैसा कमवत आहेत. हे ‘भारतरत्न’ या प्रतिष्ठित व सर्वोच्च पुरस्काराचे पावित्र्य, वारसा व मूल्यांविरुद्ध आहे. त्यामुळे सचिन यांनी नैतिक आधारावर स्वत:हून ‘भारतरत्न’ परत करावा. ते असे करणार नसतील तर केंद्र सरकारने हा सन्मान त्यांच्याकडून परत घ्यावा, अशी मागणी नस्वा यांनी आपल्या याचिकेत केली आहे. नस्वा यांनी न्यायालयात स्वत: युक्तिवाद करीत, आपली बाजू मांडली. (वृत्तसंस्था)