शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Sadabhau Khot: “राजस्थानातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय, पाणी प्रश्न दूर करणार”: सदाभाऊ खोतांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 16:28 IST

Sadabhau Khot: राजस्थानमधील शेतकरी बांधवांनी सदाभाऊ खोत यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

जयपूर: देशभरातील शेतकरी बांधवांसमोर अनेक प्रश्न उभे आहेत. अलीकडेच वादग्रस्त केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्यात आले. शेतकरी आंदोलनाचे हे मोठे यश असल्याचे बोलले जात आहे. विरोधकांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात असल्याचे केंद्रातील मोदी सरकारकडून सांगितले जात आहे. यातच रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे राजस्थान दौऱ्यावर होते. यावेळी राजस्थानातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असून, पाणी प्रश्न दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वास सदाभाऊ खोत यांनी दिले. 

राजस्थान येथील किसनपुरा जि.पाली येथे भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला. येथील शेतकरी बांधवांनी आमदार सदाभाऊ खोत यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. राजस्थान राज्यातील शेतकरी बांधवांनी अवस्था अत्यंत दयनीय आहे. शेकडो एकर शेती असूनही ती पाणी नसल्यामुळे पिकवू शकत नाहीत. आगामी काळात शेतकरी बांधवांच्या शेतीला पाणी देण्याबाबत भविष्यात प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सदाभाऊ खोत यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना दिली.

राजस्थानातील शेतकरी प्रचंड कष्टाळू

राजस्थानधील किसानपुरा येथील शेतकरी मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांनी उपस्थिती लावली होती. यावेळी शेतकरी बांधवांना संबोधित करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, राजस्थानातील शेतकरी बांधव प्रचंड कष्टाळू आहे. परंतु पाण्याच्या अभावामुळे त्यांना शेती करता येत नाही. येथील शेतकरी बांधवांची एकच मागणी आहे आमच्या शेतीला पाणी द्या. त्या शेतीमधून आम्ही सोने पिकवू. भविष्यात यासाठी निश्चित प्रयत्न करणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांचे संघटना देखील उभारेन, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.  

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Rajasthanराजस्थानFarmerशेतकरीagricultureशेती