शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

महाराष्ट्राला क्रांतिकारकांचा विसर सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

By admin | Published: November 15, 2015 11:14 PM

पुणे : महाराष्ट्र महापुरुष आणि क्रांतिकारकांची आठवण करण्यात कमी पडत असून राज्याने हा कद्रूपणा सोडायला हवा. देशासाठी प्रेरणा असणार्‍या लोकांचा विसर पडता कामा नये. असे मत संतसाहित्याचे अभ्यासक व ८८ व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

पुणे : महाराष्ट्र महापुरुष आणि क्रांतिकारकांची आठवण करण्यात कमी पडत असून राज्याने हा कद्रूपणा सोडायला हवा. देशासाठी प्रेरणा असणार्‍या लोकांचा विसर पडता कामा नये. असे मत संतसाहित्याचे अभ्यासक व ८८ व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
क्रांतिकारक हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या बलिदान शताब्दीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री.म.भावे, सु.ह.जोशी व इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे उपस्थित होते.
मोरे पुढे म्हणाले, देशासाठी प्राण दिलेले लोक हे केवळ भूतकाळ नाही तर त्यांच्या कार्याचा गौरव होणे गरजेचे आहे. इतिहासाचे आपल्याकडे जितके चीज व्हायला हवे तितके होत नाही त्यामुळे स्वत:ला देशप्रेमी मानणार्‍या आणि सत्तेत असणार्‍या सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे. क्रांतिकारक पिंगळे हे अतिशय पुरोगामी होते म्हणून इतक्या मोठ्या व्यक्तीला दूर सारणे चुकीचे असून ही चूक आपण लवकरात लवकर सुधारायला हवी.
भावे म्हणाले, स्वातंत्र्यासाठी अनेक चळवळी आणि लढाया झाल्या असल्या तरीही स्वातंत्र्यलढ्याला पूरक असेच क्रांतिकारकांचे काम होते. मात्र या गोष्टीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होते. स्वातंत्र्याच्या प्रवाहांचा वेध घेऊन आपल्या राष्ट्रीय चारित्र्याचा अंदाज घ्यायला हवा. त्यासाठी स्वातंत्र्याचे विविध पैलू लक्षात घ्यायला हवेत.
यावेळी सु.ह.जोशी यांनी हुतात्मा विष्णू पिंगळे यांच्या कार्याबाबत देताना आपल्या राज्यात क्रांतीवीरांना स्थान नसल्याबाबत खंत व्यक्त केली. पांडुरंग बलकवडे यांनी प्रास्ताविक केले.