शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

विरंगुळ्याच्या क्षणी जंगमांच्या तोंडून शिवकथा श्रवण करताना निरंजनीचे साधू-महंत

By admin | Published: September 10, 2015 4:46 PM

त्र्यंबकेश्वर : ना शाहीस्नान मिरवणूक, ना कोणते धार्मिक कार्य. अशा निवांत विरंगुळ्याच्या क्षणी त्र्यंबकेश्वर येथे जंगम समाजाचे लोक साधू-महंतांना शिवकथा ऐकवित आहेत. विशेष म्हणजे, खूश होऊन साधू-महात्मा शंभरपासून पाचशे रुपयांपर्यंत दक्षिणा देत असतानाचे दृश्य पाहावयास मिळत आहे.

त्र्यंबकेश्वर : ना शाहीस्नान मिरवणूक, ना कोणते धार्मिक कार्य. अशा निवांत विरंगुळ्याच्या क्षणी त्र्यंबकेश्वर येथे जंगम समाजाचे लोक साधू-महंतांना शिवकथा ऐकवित आहेत. विशेष म्हणजे, खूश होऊन साधू-महात्मा शंभरपासून पाचशे रुपयांपर्यंत दक्षिणा देत असतानाचे दृश्य पाहावयास मिळत आहे.
सध्या त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थविषयक वातावरण आहे. जिकडे पाहावे तिकडे सत्संग व नामांकित प्रवचनकारांची प्रवचने सुरू आहेत. भंडारा-भोजनाची रेलचेल सुरू आहे. अशा वेळी जंगम लोक शिवकथा सांगून आखाड्यांकडून मिळेल ती बिदागी व भोजनाचा लाभ घेत असतात. हे जंगम त्र्यंबकमधील दहा आखाडे, मठ, आश्रम, साधुग्राम आदि ठिकाणी दिवसभर भटकत असतात. यासंदर्भात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरीजी महाराज यांना विचारले असता ते म्हणाले, त्यांची म्हणायची ढब, म्हणताना होणारे हावभाव पाहण्यासारखे असतात. शिवपार्वती विवाहसमयी दान कोणीच घेईना. अशा वेळी भगवान शंकराला मोठा पेच पडला. दान तर दिलेच पाहिजे. शेवटी भगवान शंकराने आपल्या जांधेवर (मांडीवर) फटका मारला आणि या जंगमांची उत्पत्ती होऊन त्यांनी दान घेतले आणि तेव्हापासून जंगम शिवकथा ऐकवून दान मागतात. विशेष म्हणजे, हे लोक संन्यासींकडूनच दान घेत असतात. हे लोक प्रापंचिक असतात. डोक्यावर विशिष्ट आकाराचा फेटा बांधून दोन्ही कानांवर व डोक्यावर झांजा बसविलेल्या असतात. डोक्याच्या मध्यभागावर एक मोठा तुरा असतो आणि हा तुरा म्हणजे या समाजाची ओळख असते. गीतातून सांगितलेल्या त्यांच्या कथा साधू-महंतांना डोलायला लावतात. (वार्ताहर)
---