शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Saheed Saraj Singh : मी तर मुलगा गमावलाय, सुनेला समजवताना सासूच्याही अश्रूंचा बांध फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 13:37 IST

जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील पूँछ सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. सारजसिंग हे 16 आर.आर राष्ट्रीय रायफल्समध्ये सहभागी होते.

ठळक मुद्देरजविंदरची आई कुलवीर कौर यांनी सांगितले की, पती सारजच्या निधनाची बातमी ऐकल्यापासून रजविंदरच्या वेदना असह्य झाल्या आहेत

बरेली - मला पैसे नकोत, नोकरीही नको, सगळं काही वापस घ्या. पण, माझा पती मला परत द्या. पतीच्या निधनानंतर अश्रूंचा बांध फुटलेल्या रजविंदर कौर यांचे हे शब्द ऐकून अनेकांचे डोळे पाणावले. या परिस्थितीत रजविंदर यांना सांभाळणं कठीण बनलं होतं. कारण, आपला पती आपल्याला सोडून गेल्याचं वास्तव पचवणं त्यांना शक्य नव्हतं. तर, दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी सारजसिंग यांच्याघरी भेट दिली. त्यावेळी, आईंच्या डोळ्यातील अश्रू पाहून कलेक्टर साहेबही भावूक झाले होते.  

जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील पूँछ सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. सारजसिंग हे 16 आर.आर राष्ट्रीय रायफल्समध्ये सहभागी होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर गावात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी त्यांच्या मूळगावी गर्दी केली आहे. सारजसिंग यांची पत्नी रजविंदरसिंग मंगळवारी दुपारी जवळपास 12.30 वाजता आपल्या आई-वडिलांसह सासरी पोहोचली. कारमधून उतरताच घरात शिरल्यानंतर खाटावर बसलेल्या सासूच्या गळ्यात पडून ती मोठमोठ्यानं रडू लागली. सुनेची ही दशा पाहून सासू परमजीत कौर यांनाही अश्रू अनावर झाले. पण, त्यांनी स्वत:ला सावरले. सुनेची समजूत काढत, मुली मीही माझा मुलगा हरवलाय, स्वत:ला सांभाळ असे म्हणत परमजीत यांनीच आपल्या सुनेला धीर दिला. मात्र, पतीच्या निधनाचा मोठा धक्का रजविंदर हिला बसला होता. त्यामुळेच, ती रडता रडता बेशुद्ध पडली.

रजविंदरची आई कुलवीर कौर यांनी सांगितले की, पती सारजच्या निधनाची बातमी ऐकल्यापासून रजविंदरच्या वेदना असह्य झाल्या आहेत. दु:खाचा डोंगरच तिच्यावर कोसळला आहे, त्यामुळे ती सातत्याने बेशुद्ध पडत आहे, अनेकदा तोंडावर पाणी मारून तिला जागं केलंय. पती ज्याठिकाणी तैनात होते, तेथे कमी प्रमाणातच फोनवरुन संवाद व्हायचा. तेथील परिस्थिती खराब असल्याची जाणीव रजविंदरला व्हायची. पण, पतीने सर्वकाही ठिक असल्याचं सांगितलं होतं. रविवारी शेटवचं बोलणं पती सारजसोबत झालं होतं. त्यावेळी, डिसेंबर महिन्यात मेव्हण्याचा लग्नाला कुठल्याही परिस्थितीत सुट्टी घेऊन येणार असल्याचं पतीन म्हटलं होतं. पण, आता ते कधीच येणार नाहीत, या वास्तवाने ती पूर्णत: कोलमडली आहे.   

टॅग्स :MartyrशहीदJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी