शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

'मेक इन इंडिया'विषयी कलाम यांनी दिला होता सावधानतेचा इशारा

By admin | Published: October 18, 2015 3:01 PM

मोदी सरकारच्या मेक इन इंडिया मोहीमेविषयी दिवंगत राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन ए पी जे अब्दुल कलाम यांनी सावधानतेचा इशारा दिला होता.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ -  मोदी सरकारच्या मेक इन इंडिया मोहीमेविषयी दिवंगत राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन ए पी जे अब्दुल कलाम यांनी सावधानतेचा इशारा दिला होता. मेक इन इंडिया ही मोहीम अति महत्त्वाकांक्षी मोहीम असली तरी यामुळे भारत सर्वात स्वस्त उत्पादन केंद्र बनू नये याची दक्षता घेण्याची गरज आहे असे मत कलाम यांनी मांडले होते. सध्याचे राजकारण म्हणजे संगीत खुर्चीचा खेळ बनल्याचे कलाम यांना वाटत होते. 
अब्दुल कलाम आणि त्यांचे निकटवर्तीय सृजनपाल सिंह यांनी लिहीलेल्या 'अॅडव्हांटेज इंडिया, फ्रॉम चॅलेंज टू ऑपोर्च्यूनिटी'  या पुस्तकात कलाम यांनी त्यांची मतं मांडली आहेत. या पुस्तकाचे  लवकरच प्रकाशन होणार असून प्रकाशनापूर्वी पुस्तकातील काही भाग आता समोर आले आहेत. 'भारतातील विकासात विभिन्नता आहे. आज दूरसंचार आणि टेलिकॉम क्षेत्राने प्रगती केली आहे, पण अजूनही अनेक गावांपर्यंत वीज व रस्ते पोहोचलेले नाही. आपल्याला पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही' असे मत कमाल यांनी मांडले आहे. मेक इन इंडियासारख्या महत्त्वाकांक्षी मोहीमेची देशाला गरज आहे, मात्र यामुळे भारत सर्वात स्वस्त उत्पादन केंद्र बनू नये, यामुळे विकासाच्या मोबदल्यात जनतेला मोठी किंमत चुकवावी लागेल असे भाकीत त्यांनी व्यक्त केले आहे.
सध्याच्या राजकारणावरही कलाम यांनी पुस्तकात रोकठोख मतं मांडली आहेत. सध्याचे राजकारण संगीत खुर्चाच्या खेळाप्रमाणे बनले आहे. ठराविक नेते आणि त्यांच्या मर्जीतील मंडळी सत्तेवर येतात आणि दुस-यांच्या मार्गात अडथळे निर्माण करतात.  अशा समुहातील नेत्यांकडे प्रामाणिकपणा नसतो, हे भ्रष्ट नेते त्यांच्याकडील मशाल त्यांच्याच गटातील दुस-या गटातील नेत्याकडे सोपवतात असे परखड मत कलाम यांनी मांडले आहे. राजकारणात सुनियोजित व्यवस्था निर्माण केल्यास नवीन आणि कुशल नेत्यांना संधी मिळेल आणि भ्रष्टाचारावर लगाम लावता येईल असे कलाम यांनी नमूद केले.