शहरं
Join us  
Trending Stories
1
"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
2
'आत्महत्या म्हटलं की दक्षिणेतील नेत्यांची आठवण येते'; लक्ष्मण हाकेंनी पंकजा मुंडे-धनंजय मुंडेंना काय केली विनंती?
3
IND vs NZ Test : टीम इंडियाची घोषणा अन् RCB ला 'विराट' फायदा; फ्रँचायझीला मिळाली सुवर्णसंधी
4
"यावेळी रावणाचे अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका
5
Noel Tata : "मी रतन टाटा आणि टाटा समूहाचा वारसा..," नव्या जबाबदारीनंतर नोएल टाटांची पहिली प्रतिक्रिया
6
पावसाने केलेलं नुकसान, मुलाची अभिनयक्षेत्रात एन्ट्री! 'फुलवंती'च्या दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडेंनी सांगितलं महिला दिग्दर्शक कमी असण्याचं कारण
7
नो टेन्शन! डिलीट केलेला WhatsApp मेसेज तुम्हाला वाचायचाय?, 'ही' सोपी ट्रिक करेल मदत
8
"दुर्दैवाने राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी"; पॉडकास्टवरुन संजय राऊतांचा टोला
9
जामनगरचा नवीन 'राजा' अजय जडेजा; राजघराण्याचा पुढचा वारस ठरला, जाणून घ्या इतिहास
10
ठरलं! हरयाणात १७ ऑक्टोबरला होणार शपथविधी, नायबसिंह सैनी १० वाजता घेणार शपथ
11
इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवर मोठा सायबर हल्ला! अनुचित घटनेच्या भीतीने जग भयभीत झाले
12
हस मत पगली प्यार हो जाएगा! कॅप्टन कूल धोनीचा स्वॅग; ४३ वर्षीय माहीच्या फोटोची एकच चर्चा
13
बिग बॉस शोचा करिअरवर काय परिणाम होतो?; अभिनेत्याने सांगितलं 'सत्य', म्हणाला....
14
भारताने मालिका आधीच जिंकली; आज ३ मोठे बदल होण्याची शक्यता, अशी असेल Playing XI
15
Arkade developers share: लिस्टिंगच्या दिवशी ४८% टक्क्यांनी वधारलेला शेअर; आता तिमाही निकालानंतर पुन्हा बनला रॉकेट
16
PAK vs ENG : "पाकिस्तानला WTC मधून काढून टाका, गोंधळ लवकर थांबवा", दारुण पराभवानंतर अख्तर संतापला
17
कोजागरी पौर्णिमेला बुधादित्य राजयोग: ८ राशींवर धनलक्ष्मी प्रसन्न, पैशांची बचत शक्य; लाभच लाभ!
18
उत्तर गाझा पट्टीच्या जबलियामध्ये इस्रायलने पुन्हा हल्ला केला, २० हून अधिक लोक ठार
19
३४५ पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झालेला IPO, आता SEBIनं लिस्टिंगवर घातली बंदी; पुढे काय?
20
Sanjay Raut : 'आता मेळाव्याची लाट, लोक डुप्लिकेट मेळावे घेतात; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला

Salt Crisis: महागाई, वीजटंचाईनंतर आता देशवासियांचं भोजन होणार अळणी, रेल्वेच्या त्या निर्णयामुळे मीठटंचाईचं संकट 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 11:50 AM

Salt Crisis In India: कोळशाच्या टंचाईमुळे ऐन उन्हाळ्यात देशासमोर वीज टंचाईचं संकट उभं ठाकलेलं आहे. त्यातच आता या संकटांच्या मालिकेत अजून एका संकटाची भर पडणार असून, रेल्वेने घेतलेल्या एका निर्णयामुळे देशात मीठ टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशातील जनता महागाईने होरपळलेली असतानाच कोळशाच्या टंचाईमुळे ऐन उन्हाळ्यात देशासमोर वीज टंचाईचं संकट उभं ठाकलेलं आहे. त्यातच आता या संकटांच्या मालिकेत अजून एका संकटाची भर पडणार असून, रेल्वेने घेतलेल्या एका निर्णयामुळे देशात मीठ टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता देशवासियांचं जेवणही अळणी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

देशातील वीज टंचाई दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेने कोळशाचा पुरवठा करणाऱ्या गाड्यांना प्राधान्य दिल्याने गुजरातमधील कच्छ येथून देशातील विविध राज्यांत होणाऱ्या मिठाच्या पुवठ्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. विजेच्या संयंत्रांमध्ये कोळशाची टंचाई निर्माण जाल्याने रेल्वेने कोळशाची वाहतूक करणाऱ्या मालगाड्यांना प्राधान्य दिले आहे. दरम्यान, मिठाचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी सांगितले की, आता त्यांना औद्योगिक आणि खाण्यासाठीच्या मिठाच्या वाहतुकीसाठी दररोज केवळ ५ गाड्या उपलब्ध होत आहेत. कोळशाची आयात वाढल्यावर ही संख्या अजून कमी होऊ शकते. याआधी मिठाच्या वाहतुकीसाठी आठ गाड्या उपलब्ध होत असत.

एका रिपोर्टनुसार रेल्वे मंत्रालयाने कच्छच्या अधिकाऱ्यांना प्राधान्यक्रमाने उत्तर भारतातील सहा वीज उत्पादन केंद्रांमध्ये कोळसा पोहोचवण्यास सांगितले आहे. कच्छमधून देशातील औद्योगिक आणि भोजनात वापरण्यात येणाऱ्या मिठाच्या गरजेच्या ७५ टक्के मिठाचा पुरवठा केला जातो. एका मालगाडीच्या एका रेकमध्ये सुमारे २ हजार ७०० टन खाद्योपयोगी मीठ नेले जाते.

तर औद्योगिक वापराच्या मिठासाठी एका रेकच्या वाहतुकीची क्षमता सुमारे ३ हजार ८०० ते ४ हजार टन एवढी असते. कच्छमध्ये दरवर्षी सुमारे २.८६ कोटी टन मिठाचे उत्पादन होते. तसेच यामधील २ कोटी टन मिठाचा खप हा देशांतर्गत बाजारामध्ये औद्योगिक आणि खाद्य वापरासाठी होतो. औद्योगिक क्षेत्रात दरवर्षी १.२ कोटी टन मिठाचा वापर होतो.

मीठ उद्योगातील संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या स्थितीमुळे दीर्घकाळापर्यंत देशामध्ये मिठाची टंचाई निर्माण होऊ शकते. एकदा टंचाई निर्माण झाल्यानंतर त्याची भरपाई करण्यासाठी अनेक महिने लागू शकतात.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रालयाने त्यांना गुजरात, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये ६ विजेच्या संयंत्रांना प्राधान्यक्रमाच्या आधारावर कोळशाचा पुरवठा करण्याची सूचना दिली होती.  

टॅग्स :IndiaभारतIndian Railwayभारतीय रेल्वेbusinessव्यवसाय