शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

'रावणही साधुच्या वेषात आला होता, सावध राहा...; अखिलेश यादवांचे योगींवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 19:32 IST

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Akhilesh Yadav on CM Yogi Adityanath: उत्तर प्रदेश विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावर हल्ला चढवला होता. उर्दू भाषेपासून महाकुंभावर केलेल्या खोट्या प्रचारापर्यंत मुख्यमंत्री योगींनी समाजवादी पक्षावर टीकास्त्र डागलं होतं. त्यानंतर आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि कन्नौजचे खासदार अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भगवे कपडे घातल्याने कोणी योगी बनतो का? असा सवाल करत अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगींवर निशाणा साधला.

अखिलेश यादव यांनी कन्नौजच्या दौऱ्यावर भाजप आणि उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. अर्थसंकल्पावरुन भाजपला धारेवर धरताना हे सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करू शकत नसल्याचे अखिलेश यादव म्हणाले. सरकार खते, बी-बियाणे, कीटकनाशके वेळेवर पुरवू शकत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीत सामना करावा लागतोय असा दावा अखिलेश यादव यांनी केला.

महाकुंभाच्या निकृष्ट नियोजनाला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. महाकुंभाची वेळ वाढवण्यात यावी जेणेकरून ज्यांना आजपर्यंत स्नान करता आले नाही त्यांना संधी मिळू शकेल. भाजपचे हे असे सरकार आहे ज्यामध्ये इंजिन आणि डब्बे एकमेकांना धडकत आहेत, असं अखिलेश यादव म्हणाले.

यानंतर त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र डागलं. "भगवे कपडे घालून योगी होत नाही. भारतातील लोकांना रामायण चांगलेच माहिती आहे. रावणही माता सीतेचे अपहरण करण्यासाठी ऋषीच्या वेशात आला होता, हेसुद्धा लोकांना माहिती आहे. संपूर्ण देश आणि राज्याला माहिती आहे. हे सर्व सनातनी लोकांनाही माहीत आहे. हिंदू समाजातील लोकांना माहीत आहे. म्हणून आपण आणि आपण सर्वांनी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे," असंही अखिलेश यादव म्हणाले.

"अशा लोकांपासून सावध राहायला पाहिजे, ज्यांचे वागणे आणि भाषा अत्यंत वाईट आहे. अलोकतांत्रिक भाषा बोलत आहे. समाजवाद्यांना समाजवादाचे काहीच कळत नाही, असे म्हटलं जात आहे. समाजवादी म्हणजे सर्वांना साथ देणे, समाजवादी म्हणजे सर्वांचा आदर करणे, समाजवादी म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन चालणे. पण आमच्या मुख्यमंत्र्यांना काहीच कळत नाही. कोणतीही माहिती नसलेले हे पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यांना लोकशाहीबद्दल विचाराल तर त्यांना त्याचा अर्थही कळत नाही," असाही टोला अखिलेश यादव यांनी लगावला.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवyogi adityanathयोगी आदित्यनाथSamajwadi Partyसमाजवादी पार्टी