शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चीनला सॅमसंगचा मोठा धक्का; OLED डिस्प्ले प्रकल्पच भारतात उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 12:39 IST

भारत सरकार आणि सॅमसंगमध्ये 2019 च्या अखेरीस याबाबतचा करार झाला होता. मात्र, सध्या सुरु असलेल्या भारत-चीन आणि कोरोना वादामुळे या कराराला महत्व आले आहे. चीनपेक्षा भारतात करामध्ये सूट मिळाल्याने सॅमसंगने हा निर्णय घेतला आहे. 

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची कंपनी आणि जगभरात सर्वाधिक स्मार्टफोनचा खप असलेली सॅमसंगनेचीनला मोठा धक्का दिला आहे. सॅमसंग उत्तर प्रदेशमध्ये मोबाईल डिस्प्लेचा प्लांट उभारणार आहे. यासाठी ५ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. 

भारत सरकार आणि सॅमसंगमध्ये 2019 च्या अखेरीस याबाबतचा करार झाला होता. मात्र, सध्या सुरु असलेल्या भारत-चीन आणि कोरोना वादामुळे या कराराला महत्व आले आहे. चीनपेक्षा भारतात करामध्ये सूट मिळाल्याने सॅमसंगने हा निर्णय घेतला आहे. सॅमसंग भारतामध्ये 705.75 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे. यामुळे देशात 1300 नोकऱ्या उत्पन्न होणार आहेत. सॅमसंग ही जगातील सर्वात मोठी ओएलईडी पॅनल निर्माण करणारी कंपनी आहे. नोएडामध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार असून अन्य काही प्रकल्पही चीनमधून भारतात हलविण्याचा सॅमसंगचा विचार आहे. 

सॅमसंग कंपनीने नोएडामध्ये सर्वात मोठा स्मार्टफोन निर्मिती प्रकल्प उभारला आहे. कंपनीसोबत सध्या विविध लाभ देण्याबाबत चर्चा सुरु असून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे उत्तर प्रदेशचे उद्योग मंत्री सतीश महाना यांनी सांगितले. सध्या सॅमसंगचे तीन OLED डिस्प्ले निर्मितीचे प्रकल्प चीनमध्ये आहेत. तर नऊ प्रकल्प द. कोरियामध्ये व एक व्हिएतनाममध्ये आहे. कंपनीने आधीच एलसीडी व्यवसायातून बाहेर पडण्याचे जाहीर केले असून OLED आणि QLED वर लक्ष केंद्रीत केले आहे. भारताने कोरोनामुळे नाराजी असल्याने चीनमध्ये असलेल्या कंपन्यांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन महिन्यांत काही कंपन्यांनी भारतात प्लँट हलविण्याची घोषणाही केली आहे. 

मोबाईल साहित्य बनविणारी कंपनी लावा इंटरनॅशनल ने चीनला मोठा झटका दिला आहे. कंपनीने शुक्रवारी सांगितले की, चीनमधील प्रकल्प कायमचा बंद करून भारतात येत आहोत. कंपनीच्या संचालकांचे म्हणणे आहे की, आम्ही आता भारतातून चीनला मोबाईल निर्यात करणार आहोत. यासाठी पुढील पाच वर्षांत भारतात ८०० कोटी रुपये गुंतविण्यात येणार आहेत. तसेच जर्मनीचा फुटवेअर ब्रँड वॉन वेल्स (Von Wellx) चीनमधील उत्पादन प्रकल्प भारतात स्थलांतरीत करणार आहे. भारतात हा प्रकल्प आग्रामध्ये स्थापन केला जाणार असून लॅट्रिक इंडस्ट्रीसोबत कंपनीने करार केल्याचे समजत आहे. 

सॅमसंगला हुवावेने काढले मागेसॅमसंग ही कंपनी स्मार्टफोन विक्रीमध्ये जगामध्ये एक नंबरला होती. य़ा कंपनीला चीनची कंपनी हुवावेने मागे टाकले आहे. एप्रिलमध्ये हुवावेने सॅमसंगचा मागे काढले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

नागिन २ मधील अभिनेत्री चाहत पांडेला अटक; मामाच्या घरामध्ये केला 'तमाशा'

काँग्रेसचे नाराज मंत्री आज मुख्यमंत्र्यांना भेटणार; खदखद व्यक्त करणार

India China Face Off: ओप्पोने घेतला 'बायकॉट'चा धसका; Find X2 चे लाईव्ह लाँचिंगच केले रद्द

India China Face Off: चीनच्या वर्मावरच बोट; केंद्र सरकार टेलिकॉम उपकरणांचे मोठे कंत्राट रद्द करणार

यंदा मला जिंकवा! डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितली चीनकडे मदत

Sushant Singh Rajput Suicide: सलमान खान, करण जोहरसह ८ जणांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल

घरातच काढलेत! हे भन्नाट फोटो पहाल तर चक्कर येऊन पडाल

टॅग्स :samsungसॅमसंगchinaचीनIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेश