शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

नाद करायचा नाय! वसंतदादांच्या नातवाचं संसदेत इंग्रजीतून भाषण; केली ‘ही’ मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 2:49 PM

Sangli MP Vishal Patil Speech In English At Lok Sabha Parliament: राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना विशाल पाटील यांनी इंग्रजीतून मुद्दा मांडत राज्यातील पूरस्थितीबाबत संसदेचे लक्ष वेधून घेतले.

Sangli MP Vishal Patil Speech In English At Lok Sabha Parliament: यंदाची लोकसभा निवडणूक अनेक कारणांनी, मुद्द्यांमुळे चांगलीच गाजली. महायुतीतील अनेक दिग्गजांना धक्का बसला. तर महाविकास आघाडीतील बेबनावही पाहायला मिळाला. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत खटके उडाले. अखेर विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकले. लोकसभेचे अधिवेशन सुरू असून, विशाल पाटील यांनी चक्क इंग्रजीतून मुद्दा मांडत महत्त्वाची मागणी केली.

शिक्षण आणि इंग्रजी भाषेवरून निलेश लंके आणि सुजय विखे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर विजयी होत निलेश लंके यांनी थेट इंग्रजीतून शपथ घेतली आणि आश्चर्याचा धक्का देत विरोधकांची तोंडे बंद केली. यातच आता सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनीही बेधडकपणे इंग्रजीतून मुद्दा मांडला आणि भूमिका स्पष्ट केली. खासदार विशाल पाटील यांनी संसदेत पहिले भाषण केले आणि सांगली, कोल्हापूर व सामीवासीयांच्या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला.

सातारा, सांगली व कोल्हापूरमधील प्रश्नांवर भाष्य

विशाल पाटील यांनी संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणात महाराष्ट्राच्या सातारा, सांगली व कोल्हापूरमधील प्रश्नांना हात घातला. या भागातील पूरस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. सन २००५, २०१९ आणि २०२१ नंतर आजही तीच परिस्थिती आहे. CWC गाईडलाईनुसार या धरणांची उंची वाढविण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. कृष्णा नदीवरील साताऱ्यातील कोयना धरण आणि कर्नाटक व महाराष्ट्र सीमारेषेवरील आलमट्टी धरणासंदर्भात विशाल पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थितीची माहिती देत मोठे नुकसान होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या पूरस्थितीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांचे जीव गेले. या पुरामध्ये जनावरेही वाहून गेली. दगावली, असे सांगत विशाल पाटील यांनी सरकारने यात लक्ष घालावे, अशी मागणी केली.

दरम्यान, या परिस्थितीकडे केंद्रीय जल आयोगाच्या धोरणानुसार धरणातील पाणीसाठ्याबाबतच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे अत्यावश्यक आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. त्यात चार मुद्द्यांचा प्राधान्याने विचार करायला हवा. ज्यात कृष्णा, कोयना, पंचगंगा या नद्यांतील पाणी आणि कोयना, अलमट्टी धरणातील पाणीसाठा याचे ‘रिअल टाइम मॉनिटरिंग’ करणे, पूर व्यवस्थापन आराखडा राबवणे, पूरपट्ट्यात आवश्यक पायाभूत सुविधा देणे आणि महाराष्ट्र, कर्नाटक या दोन राज्यांतील पाटबंधारे विभागाचा समन्वय हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. कारण, या महापुरात मनुष्यबळ, पशुधन, शेतीसह मालमत्तेची मोठी हानी होते. हे टाळण्यासाठी केंद्राने लक्ष द्यायला हवे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात आसाममधील पूरबाधित क्षेत्राचा उल्लेख केला आहे. त्याप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रातील पूरबाधित क्षेत्राचा विचार करावा. येथे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे विशाल पाटील म्हणाले. 

टॅग्स :Parliamentसंसदlok sabhaलोकसभाMaharashtraमहाराष्ट्र