शहरं
Join us  
Trending Stories
1
महाशक्तीचा महायुती, मविआच्या नाराजांवर डोळा, नेते फोडणार, १०० जागांची पहिली यादी येणार; बच्चू कडूंची घोषणा 
2
"नव्या जोडप्यांनी 16-16 मुलं जन्माला घालावीत, कारण..."; CM चंद्रबाबूंनंतर, आता स्टॅलिन यांचंही अजब आवाहन
3
ठाकरे गटात अन् काँग्रेसमध्ये किती जागांसाठी वाद? ‘मविआ’तील नेत्याने सगळेच सांगितले
4
काँग्रेस पोटनिवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा एकटी लढण्याची शक्यता
5
मदरसे बंद करण्याची NCPCR ची शिफारस; सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय
6
ICU मध्ये प्रवेश न दिल्याने भाजपा आमदाराच्या भावाची दादागिरी; कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण
7
परी म्हणू की सुंदरा... तिच्या जबरदस्त खेळाने प्रतिस्पर्धी, तर सौंदर्याने चाहते घायाळ
8
“कोणताही विभाग हा एका पक्षाचा नसतो”; ठाकरे गट-काँग्रेस वादावर संजय राऊत स्पष्टच बोलले
9
करन जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'ला मिळणार अदर पूनावालांचा 'बूस्टर', विकत घेणार अर्धा हिस्सा
10
मी मरता मरता वाचलो! मराठी अभिनेत्याने सांगितला घोडबंदर रस्त्यावरील जीवघेणा प्रसंग, राजकारण्यांना लगावला टोला
11
बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम?
12
मोदी सरकारमध्ये शिवराजसिंह चौहान यांचं वजन वाढलं! पंतप्रधान मोदींनी दिली मोठी जबाबदारी
13
चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे
14
'या' हिरो बाईकने विक्रीबाबतचे सर्व रेकॉर्ड मोडले; ही नावे आहेत टॉप-5 मध्ये...
15
दिवाळीपूर्वी NTPC च्या शेअरधारकांसाठी मोठं गिफ्ट! कंपनी देणार Dividend, रेकॉर्ड डेट काय?
16
३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य
17
‘गण गण गणात बोते’चा नेमका अर्थ काय? गजानन महाराजांनी मंत्र का दिला? अखंड जपाने मिळेल पुण्य
18
मविआमध्ये 'सांगोला अन् दक्षिण'चा तिढा; महायुतीत 'करमाळा अन् मध्य'मध्ये स्पर्धा
19
आखाती देशांमध्ये १३ हजार लोकांचे नेटवर्क, हवालाद्वारे निधी... पीएफआय संदर्भात ईडीचा मोठा खुलासा
20
धक्कादायक! कोट, स्टेथोस्कोप... महिलेला डॉक्टर होण्याचे 'वेड'; डिग्रीशिवाय करत होती उपचार

"...तर मी सरन्यायाधीशांच्या पायाचे तीर्थ प्यायला तयार"; PM मोदींचा उल्लेख करत संजय राऊतांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 11:06 AM

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना केल्याचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut on CJI DY Chandrachud : भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी नुकताच अयोध्या-बाबरी मशीद वाद प्रकरणात निकाल देण्याआधीचा किस्सा सांगितला आहे. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी देवाकडे प्रार्थना केल्याचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले. सरन्यायाधीशांनी केलेल्या विधानाची देशभरात चर्चा होच आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षाच्या प्रलंबित खटल्यावरुन सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर टीका केली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड हे विष्णुचे चौदावे अवतार असू शकतात असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना केली होती, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी म्हटले आहे.  तुमची आस्था असेल तर देव तुम्हाला मार्ग शोधून देतात, देवाने मलाही मार्ग दाखवला, असेही सरन्यायाधीश म्हणाले. सरन्यायाधीश चंद्रचूड पुण्याच्या खेड तालुक्यातील कण्हेरसर या त्यांच्या मूळ गावी एका सभेत बोलत होते. सरन्यायाधीशांच्या विधानावरुन खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. ईश्वराची इच्छा काय त्यापेक्षा संविधानाची इच्छा काय हे महत्त्वाचे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं.

"म्हणून नरेंद्र मोदींना सरन्यायाधीशांना गणपतीच्या आरतीसाठी बोलवलं होतं. ते संविधानावर विसंबून नसून, कायद्याचे पुस्तक त्यांच्यासाठी महत्त्वाचे नसून त्यांना जे साक्षात्कार होतात त्यावर अवलंबून ते निर्णय घेतात की काय असं लोकांच्या मनात येऊ शकतं. ईश्वराची इच्छा काय त्यापेक्षा संविधानाची इच्छा काय. शिवसेनेला न्याय देऊ नका अशी ईश्वराची इच्छा नक्कीच नसणार. ही इच्छा विष्णुच्या तेराव्या अवताराची असेल आणि या तेराव्या अवताराने सरन्यायाधीशांना काही साक्षात्कार दिला असेल. म्हणून आमचा निकाल विधानसभेची मुदत संपल्यावरही लागणार नसेल तर नक्कीच मी सरन्यायाधीशांच्या पायाचे तीर्थ प्यायला तयार आहे. कारण ते विष्णुचे चौदावे अवतार असू शकतात," असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

काय म्हणाले सरन्यायाधीश?

"न्यायालयात काम करत असताना अशी प्रकरणं समोर येतात जी सोडवणं कठीण असतं. अयोध्या प्रकरणाचा निकाल देताना माझी अशीच काहीशी स्थिती झाली होती. अयोध्या खटल्यात तीन महिने आम्ही त्यावरील सुनावणी करत होतो. शेकडो वर्षे जो वाद कोणी सोडवू शकलं नव्हतं, तेच प्रकरण आमच्या पुढे आलं होतं. त्यावेळी यातून मार्ग कसा शोधायचा? असा प्रश्न आम्हाला पडला होता. मी या खटल्याचा निकाल देण्यापूर्वी देवाची पूजा करताना देवाकडेच मदत मागितली. मी दररोज सकाळी देवाची पूजा करतो तशीच पूजा त्या दिवशी देखील करत होतो. मी भगवंतापुढे बसलो आणि भगवंताला म्हणालो, आता तुम्हीच मला मार्ग शोधून द्या. तुमचा यावर विश्वास असेल, तुमची आस्था असेल तर देव तुम्हाला मार्ग शोधून देतात, देवाने मलाही मार्ग दाखवला,” असं सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदी