शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

"...तर मी सरन्यायाधीशांच्या पायाचे तीर्थ प्यायला तयार"; PM मोदींचा उल्लेख करत संजय राऊतांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 11:13 IST

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना केल्याचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut on CJI DY Chandrachud : भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी नुकताच अयोध्या-बाबरी मशीद वाद प्रकरणात निकाल देण्याआधीचा किस्सा सांगितला आहे. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी देवाकडे प्रार्थना केल्याचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले. सरन्यायाधीशांनी केलेल्या विधानाची देशभरात चर्चा होच आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षाच्या प्रलंबित खटल्यावरुन सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर टीका केली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड हे विष्णुचे चौदावे अवतार असू शकतात असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना केली होती, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी म्हटले आहे.  तुमची आस्था असेल तर देव तुम्हाला मार्ग शोधून देतात, देवाने मलाही मार्ग दाखवला, असेही सरन्यायाधीश म्हणाले. सरन्यायाधीश चंद्रचूड पुण्याच्या खेड तालुक्यातील कण्हेरसर या त्यांच्या मूळ गावी एका सभेत बोलत होते. सरन्यायाधीशांच्या विधानावरुन खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. ईश्वराची इच्छा काय त्यापेक्षा संविधानाची इच्छा काय हे महत्त्वाचे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं.

"म्हणून नरेंद्र मोदींना सरन्यायाधीशांना गणपतीच्या आरतीसाठी बोलवलं होतं. ते संविधानावर विसंबून नसून, कायद्याचे पुस्तक त्यांच्यासाठी महत्त्वाचे नसून त्यांना जे साक्षात्कार होतात त्यावर अवलंबून ते निर्णय घेतात की काय असं लोकांच्या मनात येऊ शकतं. ईश्वराची इच्छा काय त्यापेक्षा संविधानाची इच्छा काय. शिवसेनेला न्याय देऊ नका अशी ईश्वराची इच्छा नक्कीच नसणार. ही इच्छा विष्णुच्या तेराव्या अवताराची असेल आणि या तेराव्या अवताराने सरन्यायाधीशांना काही साक्षात्कार दिला असेल. म्हणून आमचा निकाल विधानसभेची मुदत संपल्यावरही लागणार नसेल तर नक्कीच मी सरन्यायाधीशांच्या पायाचे तीर्थ प्यायला तयार आहे. कारण ते विष्णुचे चौदावे अवतार असू शकतात," असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

काय म्हणाले सरन्यायाधीश?

"न्यायालयात काम करत असताना अशी प्रकरणं समोर येतात जी सोडवणं कठीण असतं. अयोध्या प्रकरणाचा निकाल देताना माझी अशीच काहीशी स्थिती झाली होती. अयोध्या खटल्यात तीन महिने आम्ही त्यावरील सुनावणी करत होतो. शेकडो वर्षे जो वाद कोणी सोडवू शकलं नव्हतं, तेच प्रकरण आमच्या पुढे आलं होतं. त्यावेळी यातून मार्ग कसा शोधायचा? असा प्रश्न आम्हाला पडला होता. मी या खटल्याचा निकाल देण्यापूर्वी देवाची पूजा करताना देवाकडेच मदत मागितली. मी दररोज सकाळी देवाची पूजा करतो तशीच पूजा त्या दिवशी देखील करत होतो. मी भगवंतापुढे बसलो आणि भगवंताला म्हणालो, आता तुम्हीच मला मार्ग शोधून द्या. तुमचा यावर विश्वास असेल, तुमची आस्था असेल तर देव तुम्हाला मार्ग शोधून देतात, देवाने मलाही मार्ग दाखवला,” असं सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडSanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदी