शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Satya Pal Malik: “PM मोदींना घाबरत नाही, थेट आव्हान देऊ शकतो”; सत्यपाल मलिकांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 12:15 IST

Satya Pal Malik: शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास ते हिंसाचाराचा मार्ग स्वीकारू शकतात. दिल्लीने शेतकऱ्यांशी पंगा घेऊ नये, असा सल्ला सत्यपाल मलिक यांनी दिला.

जोधपूर: गेल्या अनेक दिवसांपासून मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. तसेच कृषी कायद्यासह अनेकविध मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर मलिक सातत्याने निशाणा साधतानाही दिसत आहेत. अशातच आता जोधपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना थेट टक्कर देऊ शकतो, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. 

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास, ते त्यांना पटवून देण्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करू शकतात. केंद्राने शेतकऱ्यांशी लढा देऊ नये. ते धोकादायक लोक आहेत, असा माझा दिल्लीला सल्ला आहे, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना हवे ते मिळेल. चर्चेतून मार्ग निघाला नाही, तर ते मोठा लढा देतील आणि लढ्यातूनही काही निष्पन्न झाले नाही तर ते हिंसाचारही करतील, असे सत्यपाल मलिक यांनी सांगितले.

दिल्लीहून फोन येऊ शकतो

केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात सुमारे वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देत मलिक म्हणाले की, शेतकऱ्यांची तोंडे बंद करता येणार नाहीत. आपल्या मागण्या कशा पूर्ण करायच्या हे त्यांना बरोबर माहिती आहे. या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन सुरू करणार, तसे झाल्यास 'दिल्लीहून फोन' येऊ शकतो, असे सत्यपाल मलिक यांनी सूचित केले. यानंतर बोलताना मलिक म्हणाले की, मी दिल्लीत दीड खोलीच्या घरात राहतो. त्यामुळे मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोदींना आव्हान देऊ शकतो. यापूर्वीही जेव्हा सत्यपाल मलिक पंतप्रधानांना भेटले होते, तेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अवघ्या पाच मिनिटात भांडण झाले होते. 

दरम्यान, माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या अंगरक्षकांनी केलेल्या हत्येचा संदर्भात बोलताना राज्यपाल मलिक म्हणाले की, मी त्यांना सांगितले की, शीख आणि जाट काहीही विसरत नाहीत. तुम्ही त्यांना काहीतरी देऊन पाठवावे. त्यांना इंदिराजींचीही आठवण सांगितली होती, असे ते म्हणाले. जोधपूरमध्ये मारवाड जाट महासभेच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सत्यपाल मलिक उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणFarmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकार