शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
2
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
4
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
5
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
7
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
8
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
9
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
10
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
11
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
12
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
13
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
14
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
15
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं
16
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
17
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
18
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
19
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
20
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला

Satyapal Malik : PM नरेंद्र मोदींचा मार्ग योग्यच, सत्यपाल मलिकांनी घेतला यु-टर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 2:52 PM

Satyapal Malik : मलिक यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना मोदींसंदर्भातील विधानावरुन युटर्न घेतला आहे. मोदी हे योग्य मार्गावर आहेत, असे म्हणत शेती विधेयक परत घेतल्याच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे सत्यपाल मलिक यांनी म्हटले

ठळक मुद्देमलिक यांच्या विधानानंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली. या भेटीनंतर काय झाले, त्याविषयीही त्यांनी सांगितले. मी नेहमीच पंतप्रधानांचे म्हणणे, विचार जनतेपर्यंत पोहोचवत आलोय.

नवी दिल्ली - शेतकऱ्यांचे आंदोलन वर्षभर सुरु होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत (PM Narendra Modi) माझी भेट झाली तेव्हा ते खूप अहंकारात होते. ५ मिनिटांत माझ्यात आणि त्यांच्यात वाद झाला. ते खूप गर्विष्ठ आहेत. जेव्हा मी त्यांना सांगितले आमचे ५०० जण मृत्यू पावलेत, तेव्हा माझ्यासाठी मेलेत का? असा प्रश्न त्यांनी केला, असे खळबळजनक विधान मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केला होता. मलिक यांनी आता आपल्या विधानावरुन सारवासारव केली आहे. 

मलिक यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना मोदींसंदर्भातील विधानावरुन युटर्न घेतला आहे. मोदी हे योग्य मार्गावर आहेत, असे म्हणत शेती विधेयक परत घेतल्याच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे सत्यपाल मलिक यांनी म्हटले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणि अमित शहांचे संबंध अतिशय चांगले आहेत, शहा यांनी मोदींबाबत काहीही विधान केले नाही. शहांनी मोदींबद्दल केलेल्या विधानाच्या, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असेही मलिक यांनी म्हटले. दरम्यान, सत्यपाल यांनी अमित शहांची भेट घेतल्यानंतर, मोदींना काही लोकांनी चुकीची माहिती दिली आहे, आपण त्यांना भेटत जावे, एकदिवस त्यांना सर्वकाही समजेल, असे अमित शहांनी बोलताना म्हटल्याचे मलिक यांनी सांगितले होते. मात्र, आता त्यांनी युटर्न घेतला आहे. 

मलिक यांच्या विधानानंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली. या भेटीनंतर काय झाले, त्याविषयीही त्यांनी सांगितले. मी नेहमीच पंतप्रधानांचे म्हणणे, विचार जनतेपर्यंत पोहोचवत आलोय. जेव्हा मी त्यांना भेटलो. तेव्हा ते खूप हट्टीपणा दाखवत होते. पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरून मी अमित शाह यांना भेटलो. अमित शाह पंतप्रधान मोदींचा खूप सन्मान आणि आदर करतात, असे म्हणाले. 

मोदींना भेटायची हिंमत झाली नाही

पंतप्रधान मोदी यांच्या भेटीत झालेल्या प्रकारानंतर पुन्हा त्यांना भेटायची माझी हिंमत झाली नाही. तुम्ही आमच्यासाठी योग्य व्यक्ती नाही, असे मला सांगितले असते, तर एका मिनिटात राज्यपालपद सोडले असते. तशी मनाची तयारी मी केली होती, असे सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केले. भाजप नेत्यांचे गावागावांमध्ये जाणे कठीण झाले होते. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात कोणताही मंत्री जाऊ शकत नव्हता. तेथील जनता पंतप्रधानांचा खूप आदर करते, ही बाब वेगळी आहे. मात्र, हरियाणामध्ये तर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरू दिले नाही.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीAmit Shahअमित शाह