शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
2
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
3
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
4
न्यायाधीश अन् कोर्ट सगळंच खोटं; गुजरातमधील १०० एकर सरकारी जमीन बळकावली
5
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
6
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
7
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
8
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
9
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
10
यमुना एक्सप्रेस वेवरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
11
प्रियंका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिलेला नकार; म्हणाले, "माझ्याकडे चांगला चेहरा नाही..."
12
"देवेंद्र फडणवीसांनी फार हुशारीने..."; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, मोदींनाही सवाल
13
"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट
14
"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
16
चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर
17
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल'
18
धर्मासाठी सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, ३ हिट सिनेमात केलं होतं काम, सध्या काय करतेय २४ वर्षीय अभिनेत्री?
19
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
20
अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 

"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 5:09 PM

Saurabh Bharadwaj And BJP : आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

दिल्लीचे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. राजधानीत सणासुदीच्या काळात सुरू असलेली गुन्हेगारी, हिंसा, गँगवॉर रोखण्यात भाजपा अपयशी ठरल्याचं म्हटलं आहे. सौरभ भारद्वाज म्हणाले, "आजकाल संपूर्ण देशभरात सणांचं वातावरण आहे आणि येत्या महिनाभरात देशात अनेक सण साजरे केले जातील."

"बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पण आज बाजारात जाताना लोकांच्या मनात एक भीती असते की, केव्हापण गँगवॉर सुरू होईल आणि गोळ्या झाडल्या जातील, स्फोट होतील, गुंड कधी कुणाच्या घरात घुसून मारतील... त्यामुळे संपूर्ण दिल्लीमध्ये भीतीचे वातावरण आहे. या सर्व यंत्रणा चालवण्याची जबाबदारी, दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्रात बसलेल्या भाजपा सरकारची आहे."

"केंद्रात बसलेलं भाजपा सरकार दिल्ली या छोट्या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळू शकत नाही. ते देशाच्या सीमेवरील सुरक्षा व्यवस्था कशी सांभाळणार आहेत? दिल्ली ही देशाची राजधानी आहे आणि या राजधानीत पंतप्रधानांचं निवासस्थान आहे, राष्ट्रपतींचं निवासस्थान आहे, सर्व मंत्रालयं येथे आहेत, संसद भवन येथे आहे, सर्वोच्च न्यायालय येथे आहे. दिल्ली, सीबीआय, एसीबी, एनएसजी, दिल्ली पोलिसांचे मुख्यालय, सर्व मोठ्या सुरक्षा संस्था आणि सरकारचे विभाग दिल्लीत आहेत आणि हे सर्व असूनही, गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या आज दिल्लीत सक्रिय आहेत."

"आज दिल्लीची स्थिती अशी आहे की, मिठाईच्या दुकानांमध्ये गोळ्या झाडल्या जात आहेत, कारच्या शोरूममध्ये गोळ्या झाडल्या जात आहेत, ग्रेटर कैलासमधील जिमच्या बाहेर वेलकम कॉलनीत रस्त्यावर खुलेआम ६० राउंड गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. मालकाची हत्या, रोहिणीतील एका दाम्पत्याच्या घरात घुसून ५ कोटी रुपये लुटले. रोज उघडपणे गुन्हे घडत असतात" असंही देखील सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :AAPआपdelhiदिल्लीBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी