शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेत सावरकरांचा फोटो, भाजपचा चिमटा; काँग्रेसचे स्पष्टीकरण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 7:57 PM

काँग्रेस आणि भाजप नेते परत एकदा वीर सावरकरांवरुन आमने सामने आले आहेत.

नवी दिल्ली: वीर सावरकर पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. केरळमध्ये काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान काँग्रेसच्या पोस्टरवर स्वातंत्र्यसैनिकांच्या फोटोंमध्ये सावरकरांचा फोटो दिसल्यानंतर हे प्रकरण उफाळून आले आहे. काँग्रेसच्या दौऱ्यात वीर सावरकरांचा फोटो दाखवल्याबद्दल भाजपच्या एका नेत्याने राहुल गांधींपासून ते जवाहरलाल नेहरूंपर्यंत सर्वांची खिल्ली उडवली, तर काँग्रेसकडून जोरदार पलटवार करण्यात आला. बटेश्वर प्रकरणात वीर सावरकरांची माफी आणि अटलबिहारी वाजपेयी यांची साक्ष यासंबंधीचा वादही त्यांनी उघड केला.

छपाईदरम्यान चूक झालीभाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी 'भारत जोडो यात्रे'च्या पोस्टरचा फोटो ट्विट केला होता. त्यात स्वातंत्र्यसैनिकांच्या मधोमध वीर सावरकरांचा फोटोही आहे. यावर काँग्रेसने स्वतःचा बचाव करत याला प्रिंटिंग मिस्टेक म्हटले आहे. पोस्टरवर स्वातंत्र्यसैनिकांचे चित्र हवे होते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. एका बूथ स्तरावरील कार्यकर्त्याने सांगितले की, पोस्टर डिझाइन करणाऱ्या मुलाने हे फोटो ऑनलाइन शोधले होते. त्यांने नीट न तपासता ही छपाई केल्याचे काँग्रेसचे म्हणने आहे.अमित मालवीय यांची खोचक टीकाहे पोस्टर केरळमधील एर्नाकुलम विमानतळाजवळ लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या फोटोसोबत अमित मालवीय यांनी लिहिले – 'एर्नाकुलममध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत वीर सावरकरांचाही फोटो आहे. उशीरा का होईना, राहुल गांधींना जाणीव झाली. राहुल यांचे पणजोबा नेहरू पंजाबच्या नाभा तुरुंगात असताना इंग्रजांना विनंती करुन अवघ्या दोन आठवड्यांत बाहेर आले होते.' 

जयराम यांचा भाजपवर पलटवारअमित मालवीय यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पलटवार केला आहे. 'तुम्हाला वस्तुस्थिती माहित नाही. एखाद्या गोष्टीला चुकीच्या पद्धतीने दाखवून, तुम्ही बदनामी करता. आम्ही त्यांच्याविरोधात मानहानीची नोटीस पाठवत आहोत. भारतीय कम्युनिस्ट पक्षही असे प्रश्न उपस्थित करत आहे. व्हीपी सिंग सरकारच्या काळात सीपीएम आणि भाजपची युती होती, तसाच प्रकार सुरू आहे,' असं ते म्हणाले.खेरांनी ‘बटेश्वर साक्षी’चा मुद्दा उपस्थित केलाकाँग्रेस नेते पवन खेरा यांनीही याबाबत भाजपला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की जवाहरलाल नेहरू यांनी सुमारे 10 वर्षे तुरुंगात घालवली आणि त्यांनी कधीही दयेचा अर्ज लिहिला नाही. प्रथम सावरकरांनी, नंतर अटलबिहारी वाजपेयी आणि इतरांनी लिहिला. बटेश्वरच्या साक्षीचे काय?' असा प्रश्न त्यांनी भाजपला विचारला.

काय आहे 1942चे बटेश्वर प्रकरण?

बटेश्वरचे प्रकरण 1942 सालचे आहे. या वादाने अटलबिहारी वाजपेयींचा कधी पिच्छा सोडला नाही. अटलबिहारी वाजपेयी हे आग्रा जवळील बटेश्वरचे रहिवासी होते. त्यांच्यावर आरोप आहे की, 1942 मध्ये 'भारत छोडो' आंदोलन सुरू असताना त्यांनी वनविभागाच्या कार्यालयावर तिरंगा फडकवण्याच्या घटनेची इंग्रजांसमोर साक्ष दिली होती, त्यामुळे 4 स्वातंत्र्यसैनिकांना शिक्षा झाली होती. वाजपेयींनी या वादातून अनेकवेळा दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण 2004 मध्ये त्यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत लढवणारे राम जेठमलानी यांनी ही बाब समोर आणली होती. लीलाधर वाजपेयी यांना पुढे करून त्यांनी या वादाला खतपाणी घातले होते. बटेश्वर प्रकरणात तुरुंगात गेलेल्या लोकांपैकी लीलाधर वाजपेयी हेदेखील एक होते.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा