शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

म्हणे पठाणकोट हे भारताचेच नाटक

By admin | Published: April 06, 2016 4:45 AM

पठाणकोट हवाई तळावर हल्ला करणारे चार दहशतवादी पाकिस्तानी होते हे कबूल केल्यानंतर काही दिवस उलटत नाही तोच पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) कोलांट उडी मारत

नवी दिल्ली : पठाणकोट हवाई तळावर हल्ला करणारे चार दहशतवादी पाकिस्तानी होते हे कबूल केल्यानंतर काही दिवस उलटत नाही तोच पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) कोलांट उडी मारत पठाणकोट हल्ला म्हणजे पाकला बदनाम करण्यासाठी भारतानेच रचलेले नाटक होते, असा आरोप केला आहे. जेआयटीच्या या आरोपाबाबतचे वृत्त ‘पाकिस्तान टुडे’त प्रसिद्ध झाले आहे. पठाणकोटच्या तपासासाठी नुकतेच भारतात येऊन गेलेले हे पथक पंतप्रधान नवाज शरीफ यांना अहवाल सादर करणार आहे. या अहवालाची माहिती जेआयटीच्या एका सूत्राने पाकिस्तान टुडेला दिली. भारताला हल्ला होण्यापूर्वीच दहशतवाद्यांविषयी माहिती होती, असा भयंकर निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. जेआयटीने एनआयए अधिकारी तंजील अहमद यांच्या हत्येचाही संदर्भ दिला आहे. उत्तर प्रदेशात शनिवारी झालेल्या या हत्येतून भारत हे प्रकरण दडपत असल्याचे स्पष्ट होते, असेही या अहवालात नमूद आहे. भारतीय लष्कर आणि कथित दहशतवादी यांच्यातील संघर्ष अवघ्या काही तासांत संपला. यावरून हा हल्ला पाकची प्रतिमा मलिन करण्यासाठी रचलेले नाट्य होते, असे स्पष्ट होते. हल्ल्याच्या रात्री तळावरील दिवे सुरू नव्हते. यावरून भारताला दहशतवाद्यांची आधीच माहिती होती की काय असा स्वाभाविक प्रश्न उपस्थित होतो, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानी माध्यमे किंवा जेआयटीने भारतावर पुरावे लपविल्याचा आरोप करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही असे आरोप करण्यात आलेले आहेत. भारतीय अधिकाऱ्यांनी जेआयटीला पुरावे व माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे वृत्त दुनिया न्यूज या पाकिस्तानी वृत्तवाहिनीने २८ मार्च रोजी दिले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)४पाकिस्तानी जेआयटीच्या या अहवालाबाबत आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे याच जेआयटीने काही दिवसांपूर्वी हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे कबूल केले होते. एवढेच नाहीतर या दहशतवाद्यांचे जैश-ए-मोहंमद या संघटनेशी संबंध जोडण्याइतपत पुरेसे पुरावे आपल्याकडे असल्याचेही म्हटले होते.हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांचे डीएनए अहवाल, दूरध्वनी नोंदी आणि पठाणकोट हवाई तळाच्या कमांडरची माहिती जेआयटीला देण्यात आली नाही, असे डेली टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे, तर हल्ल्याबाबत भारत सरकार आणि सीमा सुरक्षा दलाच्या भूमिकेतच विरोधाभास असल्याचा दावा दुनिया न्यूजच्या वृत्तात करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी दहा फूट उंचीच्या संरक्षक भिंतीवर चढून पठाणकोट हवाई तळावर प्रवेश केल्याचे भारतीय प्रशासनाने म्हटले आहे. मात्र, दहशतवाद्यांनी चढाईसाठी वापरलेले दोरखंड कुठेही आढळून आले नाहीत, असेही या अहवालात नमूद आहे.