शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

Assembly Election Result 2022: घोटाळ्यांनी बरबटलेले लोक भ्रष्टाचारविरोधी कारवाई करणाऱ्या संस्थांना बदनाम करतायत, मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 21:28 IST

Assembly Election Result 2022 : मोदी म्हणाले, देशाच्या पैशांवर डल्लामारून आपली तिजोरी भरण्याची प्रवृत्ती काही लोकांमध्ये तयार झाली आहे. देशातील जनतेना आम्हाला संधी दिली. देशाला आमच्याकडून अपेक्षा आहेत. मोदी सरकारच भ्रष्टाचार कमी करू शकते, अशी आशा जनतेला आहे. 

नवी दिल्ली - देशातील काही लोक भ्रष्टाचाराविरोधातील कारवाया रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण पाहत आहात, की ज्या संस्था भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करत आहेत, हे लोक आणि त्यांचे इकोसिस्टिम, त्या संस्थांनाच बदनाम करण्यासाठी मैदानात येत आहेत. घोटाळ्याने बरबटलेले हे लोक एकत्रित येऊन, आपल्या इकोसिस्टिमच्या मदतीने या संस्थांवर दबाव टाकत आहे, हे देशाचे दुर्दैव आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी आज विरोधकांवर हल्ला चढवला. ते दिल्ली येथील भजपच्या मुख्यालयातून बोलत होते. 

आज देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल (Assembly Election Result 2022) जाहीर झाले. यांपैकी पंजाब वगळता चार राज्यांत भाजपला घवघवीत यश मिळाले. विशेष म्हणजे या चारही राज्यांत जनतेने भाजपला पुन्हा संधी दिली. भाजपच्या या चारही राज्यांतील बंपर विजयानंतर आज भाजपाच्या दिल्ली येथील मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना आणि देशातील जनतेला संबोधित केले.

यावेळी, मला सांगा, भष्टाचाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी की नको? असा सवाल करत मोदी म्हणाले, देशाच्या पैशांवर डल्लामारून आपली तिजोरी भरण्याची प्रवृत्ती काही लोकांमध्ये तयार झाली आहे. देशातील जनतेना आम्हाला संधी दिली. देशाला आमच्याकडून अपेक्षा आहेत. मोदी सरकारच भ्रष्टाचार कमी करू शकते, अशी आशा जनतेला आहे. 

हे लोक, तपास संस्थांवर दबाव टाकण्यासाठी आपल्या इको सिस्टिमच्या माध्यमाने नव-नव्या पद्धती शोधून काढतात. यांना न्यायपालिकांवरही विश्वास नाही. आधी हजारो कोटींचा घोटाळा करायचा, तपासही होऊ द्यायचा नाही आणि होत असेलच तर संबंधित संस्थांवर दबाव टाकायचा, अशी या लोकांची पवृत्ती झाली आहे. एवढेच नाही, तर हे लोक एखाद्यावर कारवाई झाली, की त्याला एखाद्या जातीशी अथवा संप्रदायाशी जोडतात. मी लोकांना आवाहन करतो की, अशा भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या जातीपासून, संप्रदायापासून वेगळ करा. यामुळे समाजाचे कल्याण होईल, असेही मोदी म्हणाले.

उत्तर प्रदेशात आमच्या विजयाचे कारण हेही आहे, की येथील लोकांनी असे राजकारण सहन केले आहे. येथील लोकांच्या प्रेमाने मलाही उत्तर प्रदेशचे बनविले आहे. मी माझ्या अनुभवावरून सांगतो की, जातींना, संप्रदायांला बदनाम करणाऱ्यांपासून दूर रहायचे आणि राज्याच्या विकासालाच प्राधान्य द्यायचे, हे या लोकांनी निश्चित केले आहे, असेह मोदी यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाdelhiदिल्लीElectionनिवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२