शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

खडाजंगी सुरूच !

By admin | Published: December 23, 2016 5:37 AM

अतिरेक्यांना सीमापार करण्यासाठी पाकिस्तान जशी मदत करतो, त्याच प्रकारे भ्रष्ट लोकांना वाचविण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष

वाराणसी : अतिरेक्यांना सीमापार करण्यासाठी पाकिस्तान जशी मदत करतो, त्याच प्रकारे भ्रष्ट लोकांना वाचविण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करताहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आता काळ्या पैशाबराबेरच काळी मनेही उघड होतील, अशी कोपरखळी त्यांनी मारली. अनेक लोक असे म्हणतात की, या मोठ्या निर्णयाच्या परिणामांबाबत मी विचार केला नव्हता. खरेतर, काही राजकीय पक्ष व नेते हे भ्रष्ट मंडळींना वाचवण्यासाठी पुढे येथील, याचा विचार मी केला नव्हता. मी या निर्णयाबाबत आनंदी आहे, असेही मोदी म्हणाले. नोटाबंदीनंतर प्रथमच आपल्या मतदारसंघात ते आले. नोटाबंदीनंतर सरकारवर टीका करणारे विरोधी पक्ष हे निगरगट्टपणे भ्रष्ट आणि अप्रामाणिक लोकांच्या बाजूने उभे आहेत, असा हल्लाबोल मोदी यांनी बनारस हिंदू विद्यापीठातील कार्यक्रमात केला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशात ५० टक्के नागरिक गरीब आहेत. तिथे कॅशलेस पद्धत कितपत योग्य आहे, असा सवाल केला होता. त्यावर मोदी म्हणाले, मनमोहन सिंग यांचा हा दावा म्हणजे त्यांनीच त्यांचे प्रगतिपुस्तक उघड केल्यासारखे आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी भारतात निम्म्या गावांत वीज नसल्याने आॅनलाइनचा पर्याय यशस्वी होणार नाही, असे म्हटले होते. त्यावर मोदी म्हणाले की, कुणाच्या चुका कोण मोजत आहे? हे विजेचे खांब मी हटविले की वीज तारा मी कापल्या? राहुल यांची खिल्ली -च्पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आरोपानंतर ‘भूकंप’ होईल, असे वक्तव्य करणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदी यांनी खिल्ली उडविली. ते म्हणाले, काँग्रेसचा हा तरुण नेता भाषण देणे शिकल्याने मला आनंद झाला आहे. च्आपण बोललो तर भूकंप येईल, असे हा नेता म्हणाला. पण ते जर काही बोलले नसते तर मात्र भूकंप आला असता. मात्र, आता ते बोलले आहेत. त्यामुळे कोणत्याही भूकंपाची शक्यता नाही. आम्हालाही आत्मविश्वास आला आहे की आपत्तीचा धोका शिल्लक नाही. च्राहुल गांधी यांनी कालच असा आरोप केला होता की, गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी सहारा आणि बिर्ला समूहाकडून पैसे घेतले होते. थट्टा करा; पण आरोपांचे उत्तर द्या बहराईच : पंतप्रधानांनी भलेही आपली थट्टा करावी; पण भ्रष्टाचाराच्या आरोपांचे उत्तर द्यावे, असे आव्हान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे केले. ‘जनआक्रोश रॅली’त राहुल म्हणाले की, आपण देशातील तरुणांना नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. त्यांना आता फसवणूक झाल्याची जाणीव होत आहे. त्याबद्दल मोदी यांनी बोलावे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी सहारा व बिर्ला समूहाकडून रक्कम घेतल्याचे दस्तऐवज खरे आहेत की नाही, असा सवाल राहुल यांनी केला. नोटाबंदीवर जोरदार टीका करत ते म्हणाले की, मोदी यांनी हा निर्णय गरिबांसाठी घेतलेला नाही, तर देशातील अत्यंत श्रीमंत ५० कुटुंबांच्या मदतीसाठी घेतला. ज्या श्रीमंतांवर बँकांचे आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे त्यांना मदत करण्यासाठी मोदींनी गरिबांकडून पैसा घेण्याची एक परिपूर्ण योजना तयार केली आहे. गरिबांकडून पैसा शोषून घेणे आणि तो श्रीमंतांना देणे, हे नोटाबंदीचे सार आहे. काँग्रेस भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करू इच्छिते. एनडीए याबाबत कोणतेही पाऊल उचलत असेल तर, त्याला आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ. पण, नोटाबंदी भ्रष्टाचार व काळ्या पैशांविरुद्ध नाही, असे सांगून राहुल म्हणाले की, बँकांच्या रांगेत उभे लोक चोर आहेत, असे मोदी सांगतात. पण ते चोर नाहीत; प्रामाणिक लोक आहेत. पंतप्रधान विमानाने विदेशात जातात, तेव्हा सोबत सुटाबुटात दिसणाऱ्या लोकांसारखी एकही व्यक्ती या रांगांत नसते. (वृत्तसंस्था)सहाराच्या पाकिटातून काय मिळाले?मोदी यांच्यावर हल्लाबोल करताना राहुल यांनी ट्विट केले की, सहाराच्या दहा पाकिटांतून काय मिळाले होते, हे आम्हाला सांगा? त्यांनी एक दस्तऐवजही पोस्ट केला. हा प्राप्तिकर विभागाचा दस्तऐवज असल्याचे सांगण्यात येते. आॅक्टोबर २०१३ ते फेबु्रवारी २०१४पर्यंत मोदी यांना मिळालेल्या रकमेच्या नोंदी यात आहेत. अनेक उद्योग बंदराहुल म्हणाले की, दोन वर्षांत ६० टक्के संपत्ती एक टक्का लोकांकडे गेली आहे. निवडणुकीत ज्यांनी मदत केली त्यांच्याकडून कर्जवसुली केली जात नाही. आश्वासनांबाबत लोक विचारणा करू लागले, तेव्हा काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राइकचे नाटक केले. मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी नोकऱ्यांचा शब्द दिला होता. पण, अनेक उद्योग बंद पडत आहेत.