शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
3
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
4
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
5
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
6
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
7
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
8
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
9
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
10
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
11
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
12
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
13
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
14
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
15
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
16
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
17
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
18
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
19
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
20
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

School : स्कूल चले हम... हरयाणात 1 सप्टेंबरपासून 4 थी साठीही शाळेची घंटा वाजणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 9:06 PM

राज्यात शाळा व महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात 5 ते 6 दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येईल. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग कुलगुरुंच्या संपर्कात आहे.

ठळक मुद्देहरयाणात 1 सप्टेंबरपासून सर्वच सरकारी आणि खासगी शाळेंमध्ये इयत्ता 4 थी आणि 5 वी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात येत आहेत.

चंढीगड - देशात गेल्या 1.5 वर्षांपासून बंद असलेल्या शाळा आता सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. हरयाणातील मनोहरलाल ठक्कर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, राज्यातील 4 थी अन् 5 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात येणार आहेत. यासंदर्भात हरयाणा सरकारच्या अधिकृत ट्विटर अकाऊँटवरुन माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोरोना नियम पाळून कॉलेज सुरू करण्यात आले आहेत. 

देशातील विविध राज्यांत आता शाळा सुरू करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील शाळा आणि कॉलेज सुरू करण्याबाबतचा निर्णय टास्क फोर्सचा अहवाल आल्यावर घेण्यात येईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. आता, हरयाणा सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हरयाणात 1 सप्टेंबरपासून सर्वच सरकारी आणि खासगी शाळेंमध्ये इयत्ता 4 थी आणि 5 वी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात येत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी विभागाने जारी केलेल्या एसओपींचे अनुपालन करून तुकड्या लावण्यात येतील. आई-वडिलांच्या परवानगीनंतरच या मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळेल, असे ट्विट हरयाणा सरकारने केले आहे. 

अहवाल आल्यानंतर निर्णय - टोपे

राज्यात शाळा व महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात 5 ते 6 दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येईल. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग कुलगुरुंच्या संपर्कात आहे. कुलगुरु त्यांच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील अहवाल शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठवतील. साधारणपणे येत्या पाच ते सहा दिवसात निर्णय होईल. शालेय शिक्षण विभाग आणि टास्क फोर्स यांची चर्चा होऊन शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. 

टॅग्स :SchoolशाळाHaryanaहरयाणाChief Ministerमुख्यमंत्री