शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

वैज्ञानिक उत्कृष्टतेला चालना हवी

By admin | Published: January 04, 2017 2:39 AM

शिक्षण संस्थांसह सर्व भागधारकांत वैज्ञानिक उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी प्रमुख वैज्ञानिक संस्थांनी उद्योजकीय सामाजिक दायित्वाच्या (सीएसआर) धर्तीवर वैज्ञानिक

तिरुपती : शिक्षण संस्थांसह सर्व भागधारकांत वैज्ञानिक उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी प्रमुख वैज्ञानिक संस्थांनी उद्योजकीय सामाजिक दायित्वाच्या (सीएसआर) धर्तीवर वैज्ञानिक सामाजिक दायित्व (एसएसआर) योजना सुरू करावी, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केली. मूलभूतपासून उपयोजितपर्यंत विज्ञानाच्या विविध शाखांना साहाय्य, तसेच नाविन्यपूर्णतेवर भर देण्याप्रतीची सरकारची बांधिलकी अधोरेखित करतानाच विध्वंसक तंत्रज्ञानावर नजर ठेवण्याचे, तसेच देशाच्या वृद्धीसाठी तडफेने काम करण्याचे आवाहनही त्यांनी शास्त्रज्ञांना केले. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या १०४ व्या अधिवेशनाच्या उ्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संशोधन आणि विकासाच्या मूलभूत पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि कुशलता निर्माण करून देशाला भक्कम बनविणे आवश्यक आहे, असे सांगून ते म्हणाले, आपल्या प्रमुख संस्थांना शाळा व महाविद्यालयांसह सर्व भागधारकांशी जोडण्यासाठी उद्योजकीय सामाजिक दायित्वाच्या धर्तीवर वैज्ञानिक सामाजिक दायित्व ही संकल्पना राबविण्याची गरज आहे. आमच्या तरुणांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उच्चकोटीचे प्रशिक्षण मिळाल्यास, स्पर्धात्मक युगात नोकरी मिळविण्यास ते सक्षम होऊ शकतील. सायबर फिजिकल तंत्राचा वेगवान जागतिक उदय या क्षेत्राकडे विशेष लक्ष पुरविण्याची गरज आहे. रोबोट विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल उत्पादन, आकडेवारीचे विश्लेषण, सखोल अभ्यास, क्वांटम दूरसंचार आणि इंटरनेटमध्ये संशोधन, प्रशिक्षण आणि कौशल्य याद्वारे आपण याचे मोठ्या संधीत रूपांतर करू शकतो. तंत्रज्ञानाचा विकास करून त्यांचा उपयोग सेवा आणि उत्पादन, कृषी क्षेत्रासह जल, ऊर्जा आणि वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य, पर्यावरण, सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि भू माहिती प्रणाली, आर्थिक प्रणाली आणि गुन्हेगारीविरुद्धच्या लढ्यात करू शकतो. अकॅडमिक, स्टार्ट अप्स, उद्योग आणि संशोधन आणि विकास प्रयोगशाळांना उपलब्ध होऊ शकेल, अशी विज्ञान व तंत्रज्ञानाची भक्कम पायाभूत सुविधा उभारण्यास सरकारचे प्राधान्य आहे. वैज्ञानिक संस्थांतील महागड्या उपकरणांची प्रतिरूपे तयार करणे, अतिरेकी वापर, सहज उपलब्धता, देखभाल आदी समस्या सोडविण्याची गरज आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. (वृत्तसंस्था)‘संशोधक’ शिक्षकांनी विद्यापीठांशी संलग्न व्हावे- शहरी भागातील प्रयोगशाळा, संशोधन संस्था आणि विद्यापीठांनी केंद्र म्हणून काम करण्यासाठी स्वत:ला इतर संस्थांशी जोडून घेतले पाहिजे. - संशोधनाची पार्श्वभूमी असलेले महाविद्यालयीन शिक्षक नजीकची विद्यापीठे आणि संशोधन आणि विकास संस्थांशी संलग्न होऊ शकतात.- या संस्थांनी शाळा, महाविद्यालये आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयांपर्यंत पोहोचून प्रशिक्षण उपक्रम सुरू केल्यास विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्मितीला चालना मिळेल. तसेच शालेय विद्यार्थ्यांत कल्पना आणि नाविन्यपूर्णतेचे बीजारोपण केल्यामुळे नविनीकरणाच्या पायाची व्याप्ती वाढून देशाचे भवितव्य सुरक्षित राहील, असेही ते म्हणाले.