शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

भिन्न प्रमाण वेळांचा वैज्ञानिक अभ्यास

By admin | Published: June 23, 2017 12:24 AM

संपूर्ण भारतासाठी सध्या असलेली एकच प्रमाण वेळ बदलून विविध भागांसाठी भिन्न प्रमाण वेळा ठरविणे कितपत व्यवहार्य आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संपूर्ण भारतासाठी सध्या असलेली एकच प्रमाण वेळ बदलून विविध भागांसाठी भिन्न प्रमाण वेळा ठरविणे कितपत व्यवहार्य आहे याचा वैज्ञानिक अभ्यास केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने सुरू केला आहे.या विभागाचे सचिव आशुतोष शर्मा यांनी सांगितले की, सरकारला यावर निर्णय घेणे शक्य व्हावे यासाठी या विषयाच्या वैज्ञानिक बाबी तपासण्याचे काम आम्ही करत आहोत. ईशान्येकडील राज्यांसाठी स्वतंत्र प्रमाण वेळ ठरवावी, अशी मागणी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी अलीकडेच व त्याआधी आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केली होती. हे प्रकरण तिथे न्यायालयातही गेले होते.या राज्यांमध्ये देशाच्या इतर भागांच्या तुलनेत सूर्योदय व सूर्यास्त खूप लवकर होतो. मात्र सरकारी कार्यालये व अन्य व्यवहार दिल्लीच्या प्रमाण वेळेनुसार होत असल्याने ते सुरू होईपर्यंत अर्धा दिवस संपलेला असतो. कार्यालयीन वेळ संपेपर्यंत बरीच रात्र झालेली असते. परिणामी दिवसा उजेडीचा निम्मा वेळ कामाविना जातो व रात्री वीज जाळून काम करावे लागते, असे पेमा खंडू यांनी ही मागणी करताना सांगितले होते. या संदर्भात सचिव शर्मा म्हणाले की, निरनिराळ्या प्रमाण वेळा ठरविल्याने नेमकी किती वीज बचत होऊ शकते, वाहतुकीची त्याने कितपत सोय होईल. एकूणच याचे काय फायदे-तोटे आहेत याचा वैज्ञानिक अभ्यास सुरू आहे. अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप व मिनिकॉय या द्वीपसमूहांमध्येही सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळा वेगळ्या असल्याने सामायिक प्रमाण वेळेमुळे येणाऱ्या अडचणी तेथेही आहेत.