शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

आधी जागावाटप, नंतरच चर्चा! निवडणुका होताच अखिलेश यादवांनी काँग्रेसला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 9:28 PM

इंडिया आघाडीच्या काँग्रेसने ६ डिसेंबरला बोलविलेल्या बैठकीला नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्यासह अखिलेश यादव यांनी देखील येण्यास नकार दिला होता.

मध्य प्रदेश निवडणुकीत काँग्रेसने इंडिया आघाडीतील पक्षांना सोबत घेतले नाही. अखिलेश यादव यांच्या सपाची काही ठिकाणी ताकद होती, तरीही त्यांना काँग्रेसने भाव दिला नव्हता. यामुळे या अनुभवावरून अखिलेश यांनी काँग्रेसला चांगलेच सुनावले आहे. काँग्रेसने आघाडीची ६ डिसेंबरला बैठक बोलावली होती, त्यावरून अखिलेश यांनी आधी जागावाटप नंतर पुढची चर्चा अशी अटच घातल्याने काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. 

इंडिया आघाडीच्या काँग्रेसने ६ डिसेंबरला बोलविलेल्या बैठकीला नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्यासह अखिलेश यादव यांनी देखील येण्यास नकार दिला होता. यावर आता ही बैठक १७ डिसेंबरला घेण्याचे लालू प्रसाद यादव यांनी जाहीर केले आहे. काँग्रेस स्थानिक पक्षांना भाव देत नसल्याने व पाच राज्यांतील निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्याने या पक्षांनी काँग्रेसला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. 

अखिलेश यांनी आधी जागा वाटप करावे, त्याशिवाय पुढे चर्चा करणार नसल्याची अटच घातली आहे. ज्या पक्षाची ताकद जास्त असेल त्या ठिकाणी त्या पक्षाला इतर पक्षांनी मदत करावी, त्या पक्षाचा उमेदवार द्यावा असे इंडिया आघाडीच्या बैठकीत सुरुवातीला ठरले होते. याच सुत्रावर आघाडीला पुढे जावे लागेल असे अखिलेश यांनी म्हटले आहे. यापूर्वी अखिलेश यांनी काहींचे गर्वहरण झाले असेल असा टोला काँग्रेसला लगावला होता. 

अखिलेश यादव उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाला जास्त जागा देण्याच्या मन:स्थितीत नाहीएत. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाची स्थिती अमेठी आणि रायबरेलीपेक्षा चांगली  नाही. अशा स्थितीत काँग्रेस पक्षाला आता फक्त त्या मतदारसंघांपुरतेच मर्यादित राहावे लागणार आहे, असे सपा प्रवक्ते फखरुल हसन चंद यांनी सांगितले होते. 

भाजपाचा मुकाबला करण्यासाठी २६ पक्ष एकत्र-लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि पंतप्रधान मोदींचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस, TMC, RJD, JDU, AAP, SP, DMK असे २६ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या विरोधी पक्षांच्या युतीला 'इंडिया' युती असे नाव देण्यात आले आहे. 'इंडिया' आघाडीची पहिली बैठक पाटणा येथे झाली. दुसरी बैठक बेंगळुरू येथे तर तिसरी बैठक मुंबईत झाली. यानंतर खर्गेंनी यांनी ६ डिसेंबर रोजी दिल्लीत चौथी बैठक बोलावली होती.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवcongressकाँग्रेस