शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

इशरतप्रकरणी दुसरे प्रतिज्ञापत्र योग्यच

By admin | Published: March 04, 2016 2:23 AM

इशरत जहां प्रकरणात संपुआ सरकारने प्रतिज्ञापत्रात बदल केल्याबद्दल भाजपकडून काँग्रेसवर टीका होत असताना, काँग्रेसचे नेते व माजी कायदामंत्री वीरप्पा मोईली यांनी मात्र

नवी दिल्ली : इशरत जहां प्रकरणात संपुआ सरकारने प्रतिज्ञापत्रात बदल केल्याबद्दल भाजपकडून काँग्रेसवर टीका होत असताना, काँग्रेसचे नेते व माजी कायदामंत्री वीरप्पा मोईली यांनी मात्र या बदलाचे गुरुवारी जोरदार समर्थन केले. इंटेलिजन्स ब्युरो आणि गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आधी एक प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आले होते. पण प्रत्यक्ष चौकशीमध्ये वेगळी माहिती समोर आल्याने प्रतिज्ञापत्रात बदल करावे लागले, असे त्यांनी स्पष्ट केले.पहिल्या प्रतिज्ञापत्रात चकमकीमध्ये मारली गेलेली इशरत जहां आणि अन्य तिघेही लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी असल्याचे नमूद करण्यात आले होते. ती माहिती गुप्तचर यंत्रणेकडून सरकारकडे आली होती. पण नंतरच्या चौकशीत त्याहून वेगळी माहिती समोर आल्याने प्रतिज्ञापत्रात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सांगून मोईली म्हणाले की अनेकदा असे बदल केले जातात. तो काही गुन्हा असू शकत नाही. चुकीची माहिती न्यायालयासमोर गेली असती, तर आणखी अडचणी निर्माण झाल्या असत्या. माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे समर्थन करताना ते म्हणाले की, गुप्तचर यंत्रणांनी त्या चौघांना गुजरातमध्ये येण्यास भाग पाडले होते, हे लक्षात घेतल्यास ती चकमक बनावट असल्याचेच लक्षात येईल. आरोपींना वा संशयितांना अटक करून नंतर चकमकीच्या नावाखाली ठार मारायचे, हे कायद्यात कोठेच बसत नाही, असे नमूद करून त्या काळात अन्य कोणत्याही राज्यापेक्षा तिथेच सातत्याने चकमकींचे प्रमाण वाढत होते, हे विसरून चालणार नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)