शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

दिल्लीत सम-विषम योजनेच्या दुस-या टप्प्याला सुरुवात

By admin | Published: April 15, 2016 9:45 AM

शाळकरी मुलांना तसंच एकट्या किंवा मुलांसोबत जाणा-या महिलांना सूट देण्यात आली आहे. 30 एप्रिलपर्यंत ही योजना लागू करण्यात येणार आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १५ - दिल्ली सरकारने सुरु केलेल्या सम-विषम योजनेच्या दुस-या टप्प्याला आज शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी केजरीवाल सरकारचा हा प्रयत्न आहे. मात्र वाढती गर्मी आणि शाळा सुरु असल्याने दिल्लीकरांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल यांनी मात्र दिल्लीकर चांगला प्रतिसाद देतील अशी आशा व्यक्त केली आहे. यावेळी शाळकरी मुलांना तसंच एकट्या किंवा मुलांसोबत जाणा-या महिलांना सूट देण्यात आली आहे. 30 एप्रिलपर्यंत ही योजना लागू करण्यात येणार आहे.
 
नियमांच उल्लंघन करणा-यांकडून दंड वसूल करण्यासाठी सरकारने 120 पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी महिन्यात पहिल्या टप्प्यावेळी 110 पथक पाठवण्यात आली होती. स्वयंसेवकांच्या संख्येतही वाढ करण्यात आली असून 5300 स्वयंसेवक रस्त्यावर असणार आहेत. लोकांमध्ये जागरुकता पसरवण्याचं तसंच नियमांच पालन करण्याचं आवाहन स्वयंसेवक करणार आहेत. 
 
120 पथकांमध्ये माजी सैनिकांचादेखील समावेश असणार आहे. वाहतूक विभागातर्फे विशेष माजी सैनिकांची वाहतूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतूक विभागातील अंमलबजावणी पथकाचे 180 कर्मचारी देखील यात सहभागी असून नियमांचं उल्लंघन करणा-यांकडून 2 हजारांचा दंड वसूल करण्याच काम करणार आहेत. 
पहिल्या टप्प्यातील योजनेशी तुलना करता यावेळी दिल्लीतील हवामान वेगळे आहे ज्याचा परिणाम योजनेवर होऊ शकतो. तापमान जास्त असल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर न करता कारने प्रवास करण्यावर लोकांचा भर असेल. 'यावेळी सम-विषम योजनेत अनेक अडचणी आहेत याची आम्हाला कल्पना आहे मात्र लोकांवर आमचा विश्वास आहे', असं वाहतूक मंत्री गोपाल राय बोलले आहेत. 
 
गेल्यावेळीप्रमाणे यावेळीदेखील दुचाकी वाहनांना सूट देण्यात आली आहे. मात्र यावेळी शाळकरी मुलांना घेऊन जाणा-या वाहनांनाही सूट देण्यात आली आहे, जी गेल्यावेळी देण्यात आली नव्हती. दुसरा टप्पादेखील जर पहिल्या टप्प्याप्रमाणे यशस्वी झाला तर प्रत्येक महिन्याला पंधरा दिवसांसाठी ही योजना लागू केली जाईल अशी माहिती केजरीवाल यांनी दिली आहे.