शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

CoronaVirus News: दुसऱ्या लाटेत झाले 1 कोटी बेरोजगार; ‘सीएमआयई’चे सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 5:48 AM

९७ टक्के कुटुंबांचे उत्पन्न घटले

मुंबई : कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात सुमारे १ कोटी लोकांचा रोजगार गेला असून, ९७ टक्के कुटुंबांच्या उत्पन्नात घट झाली आहे, अशी माहिती सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे (सीएमआयई) मुख्य कार्यकारी महेश व्यास यांनी दिली.व्यास यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, मेअखेरीस बेरोजगारीचा दर १२ टक्के होण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये तो ८ टक्के होता. याचाच अर्थ असा की, देशातील तब्ब्ल एक कोटी भारतीयांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. रोजगार गमावण्यामागे कोविड-१९च्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग हे मुख्य कारण आहे. अर्थव्यवस्था पुन्हा खुली झाल्यानंतर या समस्या अंशत: कमी होतील. मात्र पूर्णत: संपणार नाहीत. व्यास यांनी सांगितले की, ज्यांनी आपला रोजगार गमावला आहे, त्यांना नवा रोजगार मिळणे कठीण झाले आहे. अनौपचारिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी लवकर उपलब्ध होतात. मात्र, अनौपचारिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी पुन्हा तयार होण्यास किमान वर्षभराचा कालावधी लागतो. ‘सीएमआयई’ने देशातील १.७५ लाख घरांचे सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी केवळ ३ टक्के उत्तरदात्यांनी त्यांचे उत्पन्न वाढल्याचे नमूद केले. ५५ टक्के लोकांनी उत्पन्न घटल्याचे नमूद केले. ४२ टक्के लोकांनी उत्पन्न आदल्या वर्षीएवढे स्थिर राहिल्याचे सांगितले. यात वाढलेली महागाई समायोजित केल्यास ९७ टक्के कुटुंबाच्या उत्पन्नात घट झाल्याचे आढळून येईल.बेरोजगारीचा चार टक्के दर मानला जातो सामान्य मे २०२० मध्ये बेरोजगारीचा दर २३.५ टक्क्यांवर गेला होता. कारण गेल्या वर्षी राष्ट्रीय लॉकडाऊन लावण्यात आले होते. अनेक जाणकारांच्या मते कोविड-१९ची दुसरी लाट आता शिखरावर असून, यापुढे तिची घसरण सुरू होईल. त्याबरोबर राज्ये अर्थव्यवस्था खुली करण्यास सुरुवात करतील. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ३ ते ४ टक्के बेरोजगारीचा दर सामान्य आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnemploymentबेरोजगारी