शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये सुरक्षा दलाची चकमक; तीन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 17:58 IST

जम्मू-काश्मीरमधील कठुआ-उधमपूर सीमेवर लष्कराच्या पथकाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

Jammu & Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी पुन्हा दहशतवाद्यांविरुद्ध मोहिम उघडली आहे. जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील कठुआ येथे बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दलांकडून अजूनही दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर निवडणुकीपूर्वी खोऱ्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमधील कठुआ-उधमपूर सीमेवर लष्कराच्या पथकाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बसंतगडमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या एका गटाची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांचे संयुक्त पथक खांद्रा टॉपच्या दिशेने गेले तेव्हा ही चकमक झाली. या परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांनी रात्री १२.५० च्या सुमारास शोध पथकावर गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. गोळीबार सुरु होताच अतिरिक्त फौजा वनक्षेत्रात पाठवण्यात आल्या होत्या.

दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली तेव्हा चकमक सुरू झाली. ज्या अंतर्गत सुरक्षा दलांनी कठुआ येथे चकमकीत ३ दहशतवाद्यांना ठार केले. ही कारवाई अद्याप सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या ऑपरेशनमध्ये लष्कराच्या १ पॅरा, २२ गढवाल रायफल्स आणि केंद्रशासित प्रदेश पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप यांचा समावेश आहे.

दरम्यान, याआधी जम्मू-काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराने केलेल्या बेछूट गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला. भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्षण करणाऱ्या बीएसएफने सांगितले की, या घटनेनंतर सैनिक हाय अलर्टवर आहेत. या सीमेचा विस्तार अंदाजे ३,३२३ किलोमीटरपर्यंत आहे, ज्यामुळे दोन्ही देशांना वेगवेगळ्या पातळीवरील तणाव आणि सुरक्षा आव्हाने वेगवेगळ्या भागांमध्ये विभागली गेली आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी