शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
2
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
3
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
4
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
5
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
6
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
7
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
8
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
9
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
10
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
11
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
12
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
13
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
14
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
15
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
16
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
17
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
18
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
19
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 

"त्यांना समजलं असतं की, हिंदू..."; अंजूच्या पाकिस्तानी तरुणासोबतच्या निकाहावर काय म्हणाली सीमा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 1:03 PM

अंजूने निकाहापूर्वी धर्म बदलत इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचे नाव फातिमा ठेवले आहे.

एकीकडे पाकिस्तानातून आपल्या प्रियकरासाठी (सचिन) भारतात आलेल्या सीमा हैदरची चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे भारतातूनपाकिस्तानात जाऊन अंजू नावाच्या महिलेने आपला फेसबुक फ्रेंड असलेल्या नसरुल्लाहसोबत निकाह केला आहे. अंजूने निकाहापूर्वी धर्म बदलत इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचे नाव फातिमा ठेवले आहे.

अंजूने निकाहनामाच्या प्रतिज्ञापत्रात स्वत:च्या इच्छेने इस्लाम स्वीकारल्याचे आणि नसरुल्लाला कायदेशीर पती मानत असल्याचे म्हटले आहे. यातच, एका टीव्ही इंटरव्ह्यूमध्ये बोलताना अंजूच्या पाकिस्तानात जाण्यावरही भाष्य करत सीमा म्हणाली, भारत एक असा देश आहे, जेथे मनुष्य सर्वकाही करू शकतो. सीमा हैदर अवैध रित्या सीमा ओलांडून नेपाळ मार्गे भारतात आली आहे आणि एटीएस सीमाची चौकशी करत आहे.

अंजूसंदर्भात काय म्हणाली सीमा? -जेव्हा सीमा हैदरला विचारण्यात आले की, भारताची अंजू पाकिस्तानात गेली. मात्र ती सर्व कायदेशीर प्रक्रिया फॉलो करत तेथे गेली. यावर काय सांगशील? यावर सीमा म्हणाली, "ती (अंजू) भारतात राहत होती. भारत एक असा देश आहे जेथे माणूस सर्व काही करू शकतो. तर पाकिस्तान एक असा देश आहे, जेथे सीमा बाहेर गेली आहे अथवा काही करत आहे, असे कुणाला समजले असते, तर माझ्यासोबत अत्यंत वाईट झाले असते. जर हैदरला समजले असते की, मी एखाद्या हिंदू मुलासोबत प्रेम करते, तर त्याने मला मारून टाकले असते."

"सिंध आणि बलुचिस्तानात महिलांना थोडाही आदर नाही."जेव्हा सीमाला विचारण्यात आले, भारत आणि पाकिस्तानात महिलांच्या स्थितीत काय फरक जाणवतो? यावर ती म्हणाली, "सिंध आणि बलुचिस्तानात महिलांना थोडाही आदर नाही. सिंधमध्ये आमच्या वयाची एकही मुलगी शिकलेली नाही. डोक्यावरील दुपट्टा चुकून जरी खाली पडला तरी शिवीगाळ होते. तेथे अत्यंत बंधनं आहेत. घरातून बाहेर पडताना डोळ्यांपर्यंत बुरखा घालावा लागतो. तर भारतात मला खूप आदर मिळत आहे. येथील लोक फार छान आहेत. इथे महिलांप्रति अत्यंत आदर आहे.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPakistanपाकिस्तानIndiaभारतmarriageलग्न