शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

स्वयंरोजगार सोसायट्यांवर बंदची टांगती तलवार अधिकार्‍यांच्या उदासिनतेचा फटका : बेरोजगार तरुणांवर कोसळणार आर्थिक संकट

By admin | Published: January 06, 2016 11:00 PM

(ग्रामीण व सेंट्रल डेस्कसाठी/हॅलोवर घेतली आहे)

(ग्रामीण व सेंट्रल डेस्कसाठी/हॅलोवर घेतली आहे)
जळगाव: सर्वच बेरोजगारांना नोकर्‍यांमध्ये संधी मिळणे शक्य नसल्याने आघाडी सरकारने बेरोजगार तरुणांना रोजगाराचे साध मिळावे यासाठी प्रत्येक जिल्‘ात स्वयंरोजगार सोसायट्यांची स्थापना केली, मात्र अधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे या संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या, परिणामी ३० टक्के संस्थाने लेखापरीक्षण झाले नाही, तोच धागा पकडून आता सरकारने या संस्था बंद करण्याचा घाट घातला आहे.
सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळावे व उद्देशाने शासनाने स्वयंरोजगार सोसायटींना चालना दिली. तत्कालीन स्वयंरोजगार मंत्री नितीन राऊत व राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी या संस्थांना एक लाखावरुन पाच लाखापर्यंत कामे देण्याचा निर्णय घेतला. तालुका निबंधकांकडे २००३ च्या सहकार कायद्यांतर्गत संपूर्ण राज्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी अकरा सदस्यांचा गट करुन या संस्था स्थापन केल्या.शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या योजनांची कामे घेऊन त्यातून रोजगाराचे साधन निर्माण केले. त्यानंतर राज्यस्तरावर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली फेडरेशनची निर्मिती झाली.
जिल्‘ात १२० संस्था
जिल्‘ात १२० संस्थांची नोंदणी करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात या संस्थाना अपवादात्मक कामे मिळाली. आता मात्र कामेही बंद झाली आहेत. तसेच संस्थेच्या सभासदांना शासनाकडून ना परतावा मिळणारे दोन हजार रुपयांची मदतही सरकारने बंद केली. परिणामी ३० टक्के संस्थांचे लेखापरीक्षणच झाले नाही.

सरकारकडे पाठपुरावा
बेरोजगारांच्या या संस्था बंद करण्याचीऐवजी त्यांना संजीवनी मिळावी यासाठी जळगाव जिल्हा सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष वाल्मीक पाटील यांनी सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही याबाबतीच साकडे घालण्यात आले आहे, परंतु अजून कुठलाच निर्णय झालेला नाही. येत्या ९ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कोट..
या संस्थांकडे सरकारने व्यवहार म्हणून न पाहता सहानुभूतीने पहावे. संस्थांना उर्जितावस्था प्राप्त करुन दिल्यास हजारो बेरोजगारांना रोजगाराचे साधन उपलब्ध होईल
-वाल्मीक पाटील, अध्यक्ष, जिल्हा सोसायटी फेडरेशन