शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

डोळ्यांतून अश्रू तरळले, भारतरत्न मिळाल्यावर लालकृष्ण अडवाणी झाले भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 16:05 IST

भाजपचे ज्येष्ठ नेते देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारने भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला.

Bharat Ratna To LK Advani ( Marathi News ): भाजपचे ज्येष्ठ नेते देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारने भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करुन माहिती दिली. भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांची पहिली प्रतिक्रीया समोर आली आहे. 

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणींच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. लालकृष्ण अडवाणी यांची कन्या प्रतिभा अडवाणी ही अडवाणींसोबत त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आहे. यावेळी त्यांनी वडिलांचे अभिनंदन केले. दरम्यान, लालकृष्ण अडवाणींनी हात जोडून अभिवादन केले.  

लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न; मुलाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “राम मंदिर आंदोलन...”

यावेळी प्रतिभा अडवाणी म्हणाल्या की, लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च सन्मान मिळाल्याने संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे. आज मला माझ्या आईची सर्वात जास्त आठवण येते कारण वडीलांच्या आयुष्यात त्यांचे योगदान मोठे आहे, मग ते वैयक्तिक असो वा राजकीय जीवन. जेव्हा मी पुरस्काराबाबत त्यांना सांगितले तेव्हा ते खूप आनंदी झाले आणि म्हणाले की त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या देशाची सेवा करण्यात घालवले. प्रतिभा अडवाणी म्हणाल्या, "इतका मोठा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी आणि देशातील जनतेचे आभार मानले.

"ते खूप भारावून गेले आहेत. ते कमी बोलतात. पण त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. राम मंदिराच्या अभिषेकवेळीही ते खूप आनंदी होते. हे त्यांच्या आयुष्यातील एक स्वप्न होते ज्यासाठी त्यांनी पाहिले होते. खूप दिवस झगडले आणि काम केले. त्यांचे व्यक्तिमत्व असे आहे की जेव्हा कोणी त्यांची स्तुती करतो तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात, असंही प्रतिभा अडवाणी म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो

लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार दिल्याबाबत सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. कुटुंबासाठी, देशासाठी आणि आम्हा सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. राम मंदिरासाठी १९९० मध्ये लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा झाली. तेव्हापासून अनेक कायदेशीर बाबी आल्या. अनेक गोष्टी घडल्या. मात्र, आजच्या घडीला प्रत्यक्षात राम मंदिर सर्वांसमोर उभे राहिले आहे. राम मंदिराचे आंदोलन हे लालकृष्ण अडवाणी यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा होता. राम मंदिराचे आंदोलन मोठ्या प्रमाणात गाजले. खूप संघर्ष झाला. आंदोलन यशस्वी होऊन राम मंदिर बनल्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे, अशी प्रतिक्रिया जयंत अडवाणी यांनी दिली.

दरम्यान, देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाल्याबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचं विविध क्षेत्रातील मान्यवरांकडूनही अभिनंदन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी लालकृष्ण अडवाणी यांचे अभिनंदन केले. 

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीNarendra Modiनरेंद्र मोदीBharat Ratnaभारतरत्न