शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

८५ विमानांचा संपर्क तुटल्यामुळे खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2016 1:02 AM

येथील सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई नियंत्रण कक्षाचा (एअर ट्रॅफिक कंट्रोल-एटीसी)विमानांशी असलेला संपर्क तुटल्याने हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.

कोलकाता : येथील सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई नियंत्रण कक्षाचा (एअर ट्रॅफिक कंट्रोल-एटीसी)विमानांशी असलेला संपर्क तुटल्याने हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. पण सुदैवाने त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.हा प्रकार गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. अवघ्या १0 मिनिटांसाठीच हे घडले असले तरी त्यामुळे ८५ विमानांशी एटीसीचा संपर्क होत नव्हता. तेथून उड्डाण घेतलेली विमाने आणि तिथे येणारी विमाने त्यामुळे संपर्काशिवाय होती. त्यांना एटीसीकडून कोणत्याही सूचना मिळू शकत नव्हत्या. सुरक्षिततेच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब होती. येणारी आणि जाणारी विमाने यांचे नेमके ठिकाण दाखवणारा एटीसीमधील डिस्प्ले बंद पडल्याने हा प्रकार घडला. त्यावेळी कोलकाता विमानतळाच्या नियंत्रण क्षेत्रात ८५ विमाने आकाशात होती.केंद्र सरकारने आणि नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने या प्रकाराची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून, याप्रकरणी अहवाल मागवला आहे. विमानांच्या वाहतुकीची माहिती देणारी यंत्रणा बंद पडल्याने प्रोटोकॉलप्रमाणे हाय फ्रिक्वेन्सीद्वारे विमानांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ती यंत्रणाही बंद पडल्याचं लक्षात आले. कोलकाता विमानतळावरील बीएसएनएल नेटवर्कबंद पडल्याने ही समस्या निर्माण झाली, असे सूत्रांनी सांगितले. इंटरनेट प्रोटोकॉलच्या माध्यमातून वापरण्यात येणाऱ्या या लाईनद्वारे वैमानिकांशी संपर्कसाधून त्यांना इतर विमानांची माहिती दिली जाते. तसेच विमानांमधील सुरक्षित अंतर किती आहे, याचे संदेश दिले जातात. (वृत्तसंस्था)