शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

EVM संशयावरुन काँग्रेस नेत्याने सुप्रीम कोर्टावर केले गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 12:10 IST

तुमचं कोणीही ऐकणार नाही, लिहिण्याने काही होणार नाही, रस्त्यावर उतरावं लागेल. जर देशातील या इग्रजांविरोधात लढायचं असेल तर आंदोलन करावं लागेल

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार उदित राज यांनी सुप्रीम कोर्टावर गंभीर आरोप केले आहेत. ईव्हीएम मुद्द्यावरुन सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल होतात. व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मतमोजणी करावी अशी मागणी होत असताना व्हीव्हीपॅटची पावत्यांची मोजणी करावी असं सुप्रीम कोर्टाला का वाटत नाही? का ते देखील या गडबडीत सहभागी आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे. 

उदित राज यांनी बुधवारी ट्विट करत निवडणूक प्रक्रियेसाठी सरकारी कामं तीन महिने संथगतीने होतात. तर मतमोजणीसाठी दोन-तीन दिवस लागले तर काय फरक  पडतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपाला ईव्हीएम बदलायची असेल त्या बदलल्या असतील. त्यासाठी निवडणुका सात टप्प्यात घेण्यात आल्या. तुमचं कोणीही ऐकणार नाही, लिहिण्याने काही होणार नाही, रस्त्यावर उतरावं लागेल. जर देशातील या इग्रजांविरोधात लढायचं असेल तर आंदोलन करावं लागेल असं त्यांनी सांगितले. 

 17व्या लोकसभेसाठी गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा रविवारी शांत झाला. सातव्या टप्प्यात 19 मे रोजी 59 जागांवर मतदान झालं असून, तत्पूर्वीच देशात कोणाचं सरकार येणार? यूपीए की एनडीए कोण बाजी मारणार? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. सरकार कोणाचं बनणार आणि देशाचा पुढचा पंतप्रधान कोण होणार याचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे. टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरनं घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एनडीएला यंदा 306 जागा मिळण्याचा अंदाज TIMES NOW-VMR 2019 Exit Pollमधून व्यक्त करण्यात आला आहे. तर इतरांना 104 जागा मिळण्याचा कयास बांधला जात आहे. तर एनडीएला 41.1 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे यूपीएला 31.7 टक्के मतं मिळतील, तर इतरांना 27.2 टक्के मत मिळण्याचा अंदाज आहे. मात्र विरोधकांनी एक्झिट पोलवर विश्वास नसून प्रत्यक्ष निकालात चित्र वेगळं असेल असा दावा केला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९VVPATव्हीव्हीपीएटीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेस