शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भुकेले जीव, रुग्णांसाठी धावून आले ‘सेवा किचन’, खुशरू पोचा यांची देशभरात मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 09:15 IST

खुशरू पोचा नामक देवदूताने गरजू नागरिकांना रेशन आणि कोरोनाच्या रुग्णांसाठी ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिल्यामुळे समाजात माणुसकी अजून जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे.

नागपूर : भुकेल्या व्यक्तीच्या पोटात दोन घास जावेत यासाठी धडपड करतो, तो खरा माणूस. कोरोनामुळे आधीच नागरिकांचा रोजगार हिरावला गेल्यामुळे त्यांना दोन वेळच्या भोजनासाठी धडपड करावी लागत आहे. अशा स्थितीत खुशरू पोचा नामक देवदूताने गरजू नागरिकांना रेशन आणि कोरोनाच्या रुग्णांसाठी ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिल्यामुळे समाजात माणुसकी अजून जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे.खुशरू पोचा हे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मुख्य कार्यालय अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. सेवा किचन या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून ते समाजसेवा करीत आहेत. त्यांच्या संस्थेची कुठेही नोंदणी झालेली नाही. समाजकार्य करताना ते कधीच कुणाकडून आर्थिक मदत घेत नाहीत. समाजातील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या मदतीवर ते गरजू नागरिकांना मदत करतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांचा रोजगार हिरावला. अशा बिकट परिस्थितीत खुशरू पोचा यांनी गरजू नागरिकांना सातत्याने भोजन व रेशन किट पुरविल्या. दुसऱ्या लाटेतही त्यांचे कार्य थांबलेले नाही. नुकतेच त्यांनी मेळघाटमध्ये ४ आणि यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे २, असे ६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठविले आहेत. गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी त्यांनी १५ किलोच्या रेशन किट तयार केल्या आहेत. त्यात पीठ, तांदूळ, डाळ, चहा, मसाले, लोणचे, तेल आदी वस्तूंचा समावेश आहे. अशा २५०० किट त्यांनी पांढरकवडा येथे पाठविल्या आहेत, तर गुजरातच्या अमरेली गावात ५०० किट, कोकणातील मालवण येथे २०० किट पाठवून गरिबांच्या चुली पेटविण्यास मदत केली आहे. नागपुरातही पॉझिटिव्ह असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ते दोन वेळचे भोजन पुरवीत आहेत, तसेच मेडिकलमध्ये दररोज १०० रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था ते करीत आहेत. देशातील २० रुग्णालयांत मदतखुशरू पोचा हे सेवा किचनच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून देशातील २० हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना भोजन पुरवीत आहेत. यात हैदराबाद, बंगळुरू, नवा रायपूर, नवी मुंबई, ठाणे, नवी दिल्ली आणि नागपूर येथील रुग्णालयांचा समावेश आहे. हमाल बांधवांना आधारलॉकडाऊनमुळे रेल्वेगाड्या ठप्प झाल्याने हमाल बांधवांचा रोजगार बुडाला. पोचा यांनी त्यांना महिनाभराचे रेशन देऊन जगण्यासाठी आधार दिला. आता रेल्वेगाड्या सुरू झाल्या; परंतु भीतीमुळे प्रवासी हमाल बांधवांना काम देण्याचे टाळत आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. अशा कठीण परिस्थितीत पोचा हे सध्या हमाल बांधवांना महिनाभराचे रेशन पुरवित आहेत.

टॅग्स :foodअन्नIndiaभारत