शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

जिल्ह्यातील सात धरणे कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2016 12:40 AM

जिल्ह्यातील सात धरणे कोरडेठाक

जिल्ह्यातील सात धरणे कोरडेठाक
जिल्ह्यातील तीन मोठे मध्यम प्रकल्प वगळता १३ छोटे धरणे आहेत. त्यात मन्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, हिवरा, अंजनी या सहा धरणांमधील उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे. तर बहुळा धरणात ०.३०२ इतका उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यातील १३ धरणांपैकी तब्बल सात धरणांमधील पाण्याची स्थिती गंभीर असल्याने या धरणांवर अवलंबून असलेले शहर आणि गावांतील पिण्याच्या पाण्याची स्थिती पुढच्या चार महिन्यात आणखी बिकट होत जाणार आहे.

सुकी, अभोरा व तोंडापूरही जेमतेम
रावेर तालुक्यातील सुकी धरणात ४०.०९५ पाणीसाठा आहे. त्यात २९.७८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणात आजच्यास्थितीला ७४.७४ टक्के पाणीसाठा आहे. तर अभोरा धरणात ५.५९२५ दलघमी पाणीसाठा आहे. त्यात ४.१७२५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. या धरणात सद्यस्थितीला ६९.३१ टक्के पाणीसाठा आहे. मंगरुळ धरणात ७.९२८ इतका जलसाठा आहे. त्यात ५.५३२ उपयुक्त जलसाठा आहे. तर मोर धरणात ७.६५९ जलसाठा असून ६.११४ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. गूळ प्रकल्पात देखील ४५.६१ टक्के जलसाठा आहे.

मार्चपासून बाष्पीभवनाचा वेग अधिक राहणार
जळगाव जिल्ह्यात उन्हाळ्यातील तापमान हे ४५ डिग्रीसेल्सीअसच्या पार जात असते. फेब्रुवारी महिन्यात जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व छोट्या प्रकल्पांची ही स्थिती आहे. त्यात मार्च महिन्यापासून तापमानात वाढ होणार असल्याने या प्रकल्पांमधील बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्याने जलसाठ्यात मोठी घट होण्याचे संकेत आहेत. यासह आवर्तन सोडल्यानंतर जमिनीमध्ये पाणी मुरण्याचे प्रमाण देखील जास्त असल्याने जलसाठ्यात झपाट्याने घट होतच राहणार आहे.
१५१ गावांमध्ये ३३९ विंधन विहिरी
पाणी टंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने १५१ गावांमध्ये ३३९ विंधन विहिरी मंजूर केल्या आहेत. तीन गावांमध्ये कुपनलिका केल्या असून २३ गावांमध्ये आठ तात्पुरत्या पाणी योजना तर ८३ गावांमध्ये विहिर अधिग्रहण करण्यात आले आहे. टंचाईच्या उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाने एक कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च केला आहे. सध्या जळगाव, जामनेर, अमळनेर व पारोळा तालुक्यातील २० गावांमध्ये १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.