शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

TMC नेत्याच्या हत्येनंतर बीरभूममध्ये हिंसाचार; 5 घरांना लावली आग, 7 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 12:16 IST

West Bengal : रामपुरहाटमध्ये तृणमूल काँग्रेसच्या उपाध्यक्षाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

बीरभूम : पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेत्याच्या हत्येनंतर मंगळवारी हिंसाचार उसळला. या ठिकाणी जमावाने 5 घरांचे दरवाजे बंद करून आग लावली. या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. ही घटना बीरभूममधील रामपूरहाटमधील आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रामपुरहाटमध्ये तृणमूल काँग्रेसच्या उपाध्यक्षाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. येथील जमावाने 5 घरांचे दरवाजे बंद करून आग लावली. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. घटनेनंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. एवढेच नाही तर डीएमसह बीरभूमचे सर्व अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

तृणमूल काँग्रेस पंचायत नेते भादू शेख यांची सोमवारी बीरभूमच्या रामपुरहाटमध्ये हत्या करण्यात आली. सोमवारी रात्री त्याच्यावर बॉम्ब फेकण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भादू शेख हे राज्य महामार्ग 50 वरून जात होते. त्यावेळी अज्ञातांनी त्यांच्यावर बॉम्ब हल्ला केला. त्यानंतर त्यांना रामपूरहाट येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. आठवडाभरापूर्वी दोन नगरसेवकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेस