शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

झारखंडमध्ये सात गावकऱ्यांची निर्घृण हत्या, पत्थलगडी आंदोलकांचे अमानुष कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 05:05 IST

झारखंडमधील पश्चिम सिंघभूम जिल्ह्यातील एका गावातल्या सात जणांची पत्थलगडी आंदोलकांच्या समर्थकांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, तसेच कु-हाडीने वार करून मंगळवारी हत्या केली.

रांची : झारखंडमधील पश्चिम सिंघभूम जिल्ह्यातील एका गावातल्या सात जणांची पत्थलगडी आंदोलकांच्या समर्थकांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, तसेच कु-हाडीने वार करून मंगळवारी हत्या केली. या सात जणांनी पत्थलगडी आंदोलनाला विरोध केल्यामुळेच त्यांना ठार मारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.झारखंडचे पोलीस महानिरीक्षक साकेतकुमार सिंह म्हणाले, बुरुगुलिकेरा गावात घडलेल्या हत्याकांडाची माहिती मिळताच पोलीस मंगळवारी रात्री तिथे चौकशीसाठी गेले.आंदोलनाला विरोध करणाºया सात गावकऱ्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांचे मृतदेह हल्लेखोरांनी जंगलात टाकून दिले होते. मृतांमध्ये ग्रामपंचायतीचा एक सदस्यही आहे. जंगलात रात्रभर शोध घेतल्यानंतर सातही जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.पत्थलगडी आंदोलनाला पाठिंबा देण्याबाबत बुरुगुलिकेरा गावामध्ये मंगळवारी एक बैठक झाली. त्यावेळी या आंदोलनाला काही जणांनी विरोध केल्यामुळे वाद निर्माण झाला. त्याचेच पर्यावसन या हत्याकांडात झाले, असे पश्चिम सिंघभूम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक इंद्रजित महाता म्हणाले.या हत्याकांडाबद्दल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. कायदा हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ असून हत्याकांड घडविणाºयांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटलेआहे. (वृत्तसंस्था)काय आहे आंदोलन?ग्रामसभांना स्वायत्तता द्या, या मागणीसाठी झारखंडमधील आदिवासी समाजाकडून पत्थलगडी आंदोलन सुरू आहे. आदिवासीबहुल भागामध्ये सरकारी कायद्यांचा अंमल नको, अशी या आंदोलकांची मागणी असून, ते जंगल, नद्यांवरील सरकारचा हक्क मान्य करीत नाहीत.आंदोलनाचे प्रतीक म्हणून हे आदिवासी आपल्या गावाबाहेर शिलालेख किंवा फलक उभारतात. हे गाव स्वायत्त भूमी असून, येथे बाहेरच्या लोकांना येण्यास मनाई आहे, असे त्या फलकावर लिहिलेले असते. सरकारी अधिकारी, पोलिसांनाही या गावांत प्रवेश करण्यास पत्थलगडी आंदोलकांकडून मज्जाव केला जातो.१९ जून रोजी एका स्वयंसेवी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांचे अपहरण करून त्यांच्यावर पत्थलगडी आंदोलकांनी सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली होती.भाजपचे माजी खासदार करिया मुंडा यांच्या तीन सुरक्षारक्षकांचे या आंदोलकांनी २६ जून रोजी अपहरण केले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. झारखंडमधील कुंती, गुमला, सिमदेहा, पश्चिम सिंघभूम या नक्षलवादग्रस्त चार जिल्ह्यांत पत्थलगडी आंदोलनाने जोर धरला आहे. 

टॅग्स :JharkhandझारखंडMurderखूनCrime Newsगुन्हेगारी