शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अयोध्या निकालाविरुद्ध पुनर्विचार याचिकेला शबाना आझमी, नसरुद्दीन शहांचा विरोध; सांगितले हे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 16:50 IST

निवेदनावर ज्येष्ठ, सामाजिक कार्यकर्ते, वकील, पत्रकार, उद्योजक, कवी, कलाकार, चित्रपट निर्माते आणि नाट्यकालावंतांच्या सह्या आहेत.

ठळक मुद्दे हा मुद्दा जिवंत ठेवल्यास मुस्लिम समुदायाला त्रास सहन करावा लागेल.अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील सुमारे १०० मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नामवंत व्यक्ती एकत्र

नवी दिल्ली - अयोध्येत रामजन्मभूमी विवादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत फेरविचार याचिका दाखल करणे मुस्लिमांच्या हिताचे नाही. या कृतीमुळे हिंदू-मुस्लिम ऐक्यावर परिणाम होऊ शकतो, असे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष घायोरूल हसन रिझवी यांनी रविवारी म्हटले होते. अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील सुमारे १०० मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नामवंत व्यक्तींनी अयोध्या निकालाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्याला विरोध दर्शवला आहे. हा वाद कायम राहिल्यास मुस्लीम समाजाचे नुकसान होऊ शकते असे या सर्वांना वाटते. पुनर्विचार याचिकेला विरोध करण्याबाबतच्या निवेदनावर ज्येष्ठ, सामाजिक कार्यकर्ते, वकील, पत्रकार, उद्योजक, कवी, कलाकार, चित्रपट निर्माते आणि नाट्यकालावंतांच्या सह्या आहेत.

आपल्या संयुक्त निवेदनात असे म्हटले आहे की, या प्रकरणात पुनर्विचार याचिकेमुळे मुस्लिमांना फायदा होण्याऐवजी त्यांचे नुकसान होईल. या निवेदनावर अभिनेता नसीरुद्दीन शाह, अभिनेत्री शबाना आझमी, पत्रकार जावेद अहमद, हैदराबादचे सामाजिक कार्यकर्ते आरिझ अहमद, चेन्नईचे वकील ए.जे. जावद आणि मुंबईचे लेखक अंजुम राजाबाली यांच्यासारख्या नामांकित व्यक्तींनी सह्या केल्या आहेत. या सर्वांच्या मते, भारतीय मुस्लिम समुदाय, घटनात्मक तज्ज्ञ आणि धर्मनिरपेक्ष संस्था या निर्णयाची सुनावणी घेताना कायद्याच्या ऐवजी विश्वासाची बाजू मांडल्याबद्दल नाराज आहेत. मात्र, हा मुद्दा जिवंत ठेवल्यास मुस्लिम समुदायाला त्रास सहन करावा लागेल.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याShabana ajhamiशबाना आझमीNaseeruddin Shahनसिरुद्दीन शाहNew Delhiनवी दिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय