शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

शेतकरी आंदोलन पोहोचले सर्वोच्च न्यायालयात, शंभू बॉर्डर खुली करण्याची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 19:26 IST

Farmers Protest : सोमवारी पुन्हा शेतकरी संघटनांची बैठक होणार आहे.

नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. शंभू सीमेसह इतर सर्व सीमा खुल्या करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. गौरव लुथरा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून ही मागणी केली आहे. गौरव लुथरा हे पंजाबचे रहिवासी आहे.  सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, पंजाब सरकार आणि हरयाणा सरकारला सर्व राज्यांच्या सीमा खुल्या करण्याचे आदेश द्यावेत. सीमा बंद करणे हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असे याचिकेत म्हटले आहे.  

या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.  दरम्यान, गेल्या शुक्रवारी दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केल्यानंतर 101 शेतकऱ्यांच्या समूहाने रविवारी पुन्हा दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला, परंतु पंजाबच्या सीमेवर हरयाणाच्या सुरक्षा जवानांनी आंदोलकांवर अश्रुधुराचे नळकांडे आणि पाण्याच्या तोफांचा मारा केला. यावेळी जवळपास नऊ शेतकरी जखमी झाल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे.यानंतर शेतकऱ्यांचा दिल्लीकडे निघणारा मोर्चा आज तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.

सोमवारी पुन्हा शेतकरी संघटनांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील कार्यवाही निश्चित केली जाणार आहे. पंजाबचे शेतकरी नेते सर्वन सिंग पंधेर यांनी सांगितले की, किमान नऊ शेतकरी जखमी झाले असून त्यापैकी एकाला चंदीगडमधील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये दाखल करण्यात आले आहे. सिंधू सीमेवर सर्वन सिंग पंधेर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी शेतकऱ्यांच्या समूहाला परत बोलावले आहे. सोमवारी संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाची बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय