शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
5
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
6
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
7
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
8
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
9
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
10
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
11
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
12
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
13
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
14
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
15
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
16
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
17
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
18
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
19
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
20
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 

त्यावेळी मी चुकलो, आज मोदींच्या धोरणामुळेच देश मजबूत स्थितीत; शशी थरुरांकडून स्तुतीसुमने

By आनंद मोहरीर | Updated: March 19, 2025 14:54 IST

Shashi Tharoor on Indian Diplomacy : एकेकाळी भारताच्या तटस्थ धोरणावर टीका करणारे काँग्रेस खासदार शशी थरुर आज सरकारचे कौतुक करत आहेत.

Shashi Tharoor on Indian Diplomacy : तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे जगात दोन गट पडले. एकाने रशियाची बाजू घेतली, तर दुसऱ्याने युक्रेनची बाजू घेतली. अशा कठीण प्रसंगी भारताने तटस्थ राहण्याचा निर्मय घेतला. यापूर्वी भारताच्या याच धोरणावर टीका करणारे काँग्रेस नेते शशी थरुर आता भारताचे कौतुक करत आहेत. थरुर यांनी मान्य केले की, भारताच्या संतुलित मुत्सद्देगिरीमुळेच जागतिक स्तरावर आपल्या देशाचे महत्त्व वाढले आहे.

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारताच्या तटस्थ धोरणावर काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी टीका केली होती. पण, आता थरुर यांची नवी प्रतिक्रिया आली आहे. भारताच्या धोरणाबाबत त्यांनी केलेली पूर्वीची टीका चुकीची असल्याचे त्यांनी मान्य केले आणि आजच्या परिस्थितीत हे धोरण यशस्वी होताना दिसत असल्याचे म्हटले. ते म्हणाले, 'मी अजूनही माझ्या चेहऱ्यावरील डाग पुसत आहे, कारण फेब्रुवारी 2022 मध्ये संसदीय चर्चेत मी एकमेव व्यक्ती होतो, ज्याने आंतरराष्ट्रीय सनद आणि तत्त्वांचे उल्लंघन केल्याच्या आधारे भारतीय भूमिकेवर टीका केली होती.'

भारताच्या धोरणामुळे राजनैतिक ताकद वाढली

रायसीना डायलॉगमध्ये बोलताना शशी थरूर म्हणाले की, जेव्हा रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले, तेव्हा मी भारताच्या भूमिकेवर टीका केली होती आणि हे आंतरराष्ट्रीय सनद आणि तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते. परंतु आता तीन वर्षांनंतर मला वाटते की, भारताच्या धोरणामुळे देश मजबूत राजनैतिक स्थितीत आला आहे. भारताच्या धोरणामुळे पंतप्रधान मोदी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष, या दोघांनाही दोन आठवड्यांच्या कालावधीत भेटू शकले. ही परिस्थिती भारताला जागतिक शांतता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी देते, जी जगातील फार कमी देशांना प्राप्त आहे.

भारताच्या धोरणावर यापूर्वी केली होती टीका रशिया-युक्रेन युद्धाच्या सुरुवातीला शशी थरुर हे रशियाबद्दल भारताच्या राजनैतिक तटस्थतेचे आणि रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या धोरणाचे मोठे टीकाकार होते. त्यांनी नैतिकदृष्ट्या चुकीचे वर्णन केले होते आणि युक्रेनवरील हल्ल्याचा उघडपणे निषेध करण्याचे भारताला आवाहन केले होते. परंतु आता भारताच्या धोरणामुळे दोन्ही देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे शक्य झाल्याचे आणि यापूर्वी केलेली टीका चुकीची असल्याचे त्यांनी मान्य केले आहे.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प