शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

“मराठा-धनगर आरक्षणप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा”; ठाकरे गटाच्या खासदारांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 12:59 IST

Shiv Sena Thackeray Group: धनगर आणि मराठा आरक्षण प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे.

Shiv Sena Thackeray Group: राज्यभरात मराठा आरक्षण मिळण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा वणवा भडकलेलाच असून, बीड, धाराशिवमध्ये संचारबंदी तर जालन्यामध्ये इंटरनेटबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको, आमरण उपोषण करण्यात आले. यातच आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम देत, पाणी पिणे बंद करण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे धनगर आरक्षणाची मागणीही जोर धरू लागली आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदारांनी धनगर आणि मराठा आरक्षणप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार आहे. यासाठी खासदार विनायक राऊत यांनी पत्र लिहिले असून, भेटीची वेळ मागितली आहे. महाराष्ट्रात मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. तसेच या विषयांतर्गत खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे खासदार व आमदारांचे शिष्टमंडळ ५ किंवा ६ नोव्हेंबर रोजी भेट घेऊ इच्छितात. कृपया आपल्या सोयीनुसार वेळ द्यावी, अशी विनंती विनायक राऊत यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात करण्यात आली आहे. 

ठाकरे गटाच्या खासदार अन् आमदारांच्या शिष्टमंडळात कोण?

खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे खासदार व आमदारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. यामध्ये खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अंबादास दानवे, अनिल देसाई, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, अजय चौधरी आणि सुनील प्रभू यांचा समावेश आहे. 

दरम्यान, मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिल्याशिवाय माघार नाही. विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण देण्याची भूमिका जाहीर करावी. शासनाने घेतलेला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावे. शासनाने काय करायचे ते करावे. बुधवारी रात्रीपर्यंत मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा रात्रीपासून पाणी पिणे बंद करणार असून, होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDhangar Reservationधनगर आरक्षणShiv SenaशिवसेनाDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूUddhav Thackerayउद्धव ठाकरे