शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

शिवराजसिंह चौहान यांनी उपोषण सोडले

By admin | Published: June 12, 2017 12:00 AM

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दुसऱ्या दिवशी रविवारी आपले उपोषण सोडले.

भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दुसऱ्या दिवशी रविवारी आपले उपोषण सोडले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही घोषणा केल्या. राज्यात आधारभूत दरापेक्षा कमी दरात शेतमाल विकणे हा गुन्हा ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांनी चौहान यांना नारळाचे पाणी देऊन उपोषण सोडले. याबाबत बोलताना शिवराजसिंह चौहान म्हणाले की, २००२ मध्ये आलेल्या स्वामीनाथन समितीच्या अहवालाबाबत मी अभ्यास केला. या अहवालाच्या शिफारशीनुसार अनेक निर्णय घेतले. दलालांना बाजूला करण्यासाठी राज्यात सर्व नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रात ‘किसान बाजार’सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे दूध खरेदी करण्यासाठी नवी प्रणाली लागू करण्यात येणार आहे. शेतमालाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी १००० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सहमतीशिवाय त्यांची जमीन संपादीत केली जाणार नाही. आदिवासींना त्यांच्या ताब्यातील काही जमीन देण्यात येईल. मुख्यमंत्र्यांचे उपोषण म्हणजे नाटक असल्याचे काँग्रेसने कालच म्हटले होते. मंदसौर येथील गोळीबारात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही चौहान म्हणाले. मंदसौरच्या काही भागातील संचारबंदी हटविली मंदसौरच्या तीनही पोलीस ठाण्यांतर्गतची संचारबंदी रविवारी हटविण्यात आली. पिपलीमंडी भागातील संचारबंदी मात्र कायम आहे. जिल्हाधिकारी ओ.पी. श्रीवास्तव यांनी सांगितले की, आज परिस्थिती शांत आहे. हिंसाचाराची कोणतीही घटना नाही. योगेंद्र यादव, मेधा पाटकर यांच्यासह ३० जणांना ताब्यात घेतले मध्य प्रदेश पोलिसांनी रविवारी योगेंद्र यादव, मेधा पाटकर आणि स्वामी अग्निवेश यांच्यासह ३० कार्यकर्त्यांना रतलाम जिल्ह्यात ताब्यात घेतले आणि नंतर त्यांची सुटका केली. पोलीस गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी ते जात होते.