शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शिवसेना खासदार संजय राऊत उवाच; व्यंकय्या नायडू नियमानुसारच वागले, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 17:13 IST

उदयराजेंनी दिलेल्या घोषणांना उपराष्ट्रपतींनी आक्षेप घेतल्यानं नवा वाद; महाविकासआघाडीकडून भाजपा लक्ष्य

मुंबई: 'जय भवानी, जय शिवाजी' घोषणेला राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहात घेतलेल्या आक्षेपावरून जोरदार राजकारण सुरू झालं आहे. या मुद्द्यावरून विरोधकांकडून भाजपाला लक्ष्य केलं जात असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यंकय्या नायडू यांना क्लीन चिट दिली आहे. 'व्यंकय्या नायडू हे सभागृहाच्या नियमानुसार वागले, पण छत्रपती शिवरायांबद्दल आमच्या काही भावना आहेत. त्या आम्ही मांडत आहोत, असं राऊत म्हणाले. 'जय भवानी, जय शिवाजी' ही घोषणा जय हिंद आणि वंदे मातरम् इतकीच महत्त्वाची असल्याचं त्यांनी म्हटलं.राज्यसभेत काल नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी संपन्न झाला. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी 'जय भवानी, जय शिवाजी' अशी घोषणा दिली होती. त्याला सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. ही घोषणा रेकॉर्डवरून काढून टाकण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यावरून आता राजकारण सुरू झालं आहे. महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी भाजपावर तोफ डागली आहे. मतांसाठी शिवराय चालतात. मग त्यांच्या नावाच्या घोषणा का चालत नाहीत, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर हल्ला चढवला. 'भाजपचं तोंड बंद का? संभाजी भिडे यांनी आता सांगली, सातारा बंदची हाक का दिली नाही?,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यानंतर खुद्द उदयनराजे यांनी सगळ्या वादावर खुलासा केला. राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाच नाही. सभागृहात असं काही घडलंच नाही. शरद पवारही तिथं होते. त्यामुळं कुणीही राजकारण करू नये,' असं आवाहन त्यांनी केलं.उदयनराजे भोसले यांच्या खुलाशानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यंकय्या नायडू नियमानं वागल्याचं म्हटलं. नायडू उपराष्ट्रपती आहेत. राज्यसभेचे सभापती आहेत. नियमांचं काटेकोर पालन करणारे आहेत. त्यांच्या दृष्टीनं म्हणाल, तर ते बरोबर आहेत. संसदीय लोकशाही व कामकाजाचे कायदे यांची त्यांना जाण आहे. आम्ही सगळे त्यांचं ऐकतो. त्यांचा आदर करतो. पण शिवरायांबद्दल आमच्या काही भावना आहेत. नियम आणि भावना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. 'जय भवानी आणि जय शिवाजी' ही घोषणा नियमबाह्य घटनाबाह्य नाही. ती असू नये, असं आमचं म्हणणं आहे. 'जय हिंद आणि वंदे मातरम्' इतकीच ती महत्त्वाची आहे,' असं राऊत यांनी म्हटलं.संजय राऊतांच्या प्रश्नावर उदयनराजेंचं उत्तर, शिवसेनेलाही केलं टार्गेट"मला छत्रपती शिवरायांबद्दल आदर अन् मी आई भवानीचा उपासक" - व्यंकय्या नायडू"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSharad Pawarशरद पवारSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी