शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

धक्कादायक! भारतात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या १८ कोटींवर; WHO ने जारी केली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 20:24 IST

जीवनशैलीच्या आजारांमुळे अकाली मृत्यूंची संख्या अंदाजे 22 टक्के

Indians, Blood Pressure: जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील उच्च रक्तदाब रुग्णांची आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार, 1990 ते 2019 दरम्यान उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. उच्च रक्तदाबाचे रुग्ण 1990 मध्ये 65 कोटींवरून 2019 मध्ये 130 कोटींवर पोहोचले आहेत. त्यापैकी 1 कोटी 80 लाख लोकांचा केवळ उच्च रक्तदाबामुळेच अकाली मृत्यू झाल्याची माहिती आहे. म्हणजेच त्यांचे बीपी नियंत्रणात असते तर आज हे लोक दगावले नसते असे तज्ज्ञांचे मत आहे. भारताबद्दल बोलायचे झाल्यास तब्बल 18 कोटी 80 लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत.

 जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांपैकी अर्ध्या रुग्णांना उच्च रक्तदाब असल्याचे माहीत नसते. जगातील 30 ते 79 वर्षे वयोगटातील उच्च रक्तदाब रुग्णांपैकी केवळ अर्धे म्हणजे 54% असे आहेत ज्यांना उच्च रक्तदाब असल्याचे माहित आहे. उच्च रक्तदाबावर उपचार घेत असलेल्यांची संख्या 42% आहे. जगात असे फक्त २१% रुग्ण आहेत ज्यांचा रक्तदाब नियंत्रणात आहे.

अहवालात काय आहे माहिती?

  • 5 पैकी 4 लोकांना योग्य उपचार मिळत नाहीत
  • जगातील प्रत्येक 3 पैकी 1 व्यक्ती उच्च रक्तदाबाचा रुग्ण
  • 50 टक्के रूग्णांना उच्च रक्तदाब असल्याची माहितीच नसते
  • उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, किडनी खराब होण्याचा धोका

WHO च्या 2019 च्या आकडेवारीनुसार, भारतात 18 कोटी 80 लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत. यापैकी ३७ टक्के रुग्णांना त्यांच्या आजाराची माहिती आहे. 30 टक्के उच्च रक्तदाबावर उपचार घेत आहेत. भारतातील केवळ 15 टक्के रुग्णांचा रक्तदाब नियंत्रणात आहे. डब्ल्यूएचओच्या अंदाजानुसार, जीवनशैलीच्या आजारांमुळे अकाली मरण पावलेल्या लोकांची एकूण अंदाजे संख्या 22% आहे. यापैकी २५% पुरुष आणि १९% महिला असतील.

2019 च्या आकडेवारीनुसार, भारतात 25 लाख 66 हजार लोक हृदयविकाराचे बळी ठरले आहेत. त्यापैकी 14 लाख 51 हजार पुरुष आणि 11 लाख 16 हजार महिला आहेत. 2019 मध्ये भारतात हृदयविकारामुळे झालेल्या 52% मृत्यूंमागे उच्च रक्तदाब हे सर्वात मोठे कारण होते. मरण पावलेल्यांपैकी ५१% पुरुष आणि ५४% महिला होत्या.

टॅग्स :Healthआरोग्यWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाIndiaभारत