शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 11:08 PM

कतर्नियाघाट जंगलाचा ४५ किमीचा पट्टा नेपाळच्या सीमेला लागून आहे. तर पूर्ण बहराइच जंगल ७० किमीच्या सीमेवर आहे. नेपाळ हा भारताचा मित्र असल्याने सर्व सीमा खुली आहे.

भारताचा शेजारी देश नेपाळच्या समाजकंटकांनी भारतीय सीमेमध्ये घुसून वनविभागावर हल्ले केले आहेत. धर्मापूर रेंजच्या पाच चौक्यांना आग लावण्यात आली आहे. 

धर्मापूरच्या विभागीय वनाधिकाऱ्यांनी याबाबतची पुष्टी केली असून उद्या वनविभागाचे कार्यालय उघडल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली जाणार असल्याचे सांगितले आहे. 

नोव्हेंबरमध्ये नेपाळी नागरिकांनी शीसम या लाकडाची दोन झाडे तोडली होती. तेव्हा १० लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कोणीही सापडला नव्हता. शनिवारी धर्मापूर रेंजच्या वन क्षेत्राधिकाऱ्यांनी एका संशयित नेपाळी नागरिकाला ताब्यात घेतले होते. त्याला रात्री सोडून देण्यात आले होते. मात्र, याचा राग आलेल्या नेपाळी नागरिकांनी काही चौक्यांना आगी लावल्या, असे कतर्नियाघाटचे वनाधिकारी बी शिव शंकर यांनी सांगितले. 

कतर्नियाघाट जंगलाचा ४५ किमीचा पट्टा नेपाळच्या सीमेला लागून आहे. तर पूर्ण बहराइच जंगल ७० किमीच्या सीमेवर आहे. नेपाळ हा भारताचा मित्र असल्याने सर्व सीमा खुली आहे. यामुळे या सीमेवरून मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. या लोकांना रोखण्यासाठी कतर्नियाघाटच्या सीमावर्ती भागात सशस्त्र सीमा सुरक्षा दलाच्या १६ चौक्या बनविण्यात आल्या आहेत. तर पूर्ण सीमेवर २३ चौक्या आहेत. तरीही नेपाळी भारतीय सीमेत घुसून वनविभागाच्या चौक्यांना आगी लावत आहेत. चौक्यांना आग लावल्यामुळे या उष्णतेच्या दिवसांत जंगलाला आग लागण्याची शक्यता होती. 

टॅग्स :Nepalनेपाळfireआगforest departmentवनविभाग