शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनोज जरांगेंनी २८८ जागांवर उमेदवार उभे करावेत, आम्ही स्वागतच करू”; लक्ष्मण हाकेंचे आव्हान
2
टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय
3
अजितदादांच्या आमदाराचा पारा चढला; महायुतीतील मित्रपक्षाच्या नेत्यांनाच इशारा
4
"या कामाची पोचपावती जनता निवडणुकीत देईल"; टोलमाफीच्या निर्णयावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
5
PAK vs ENG : शाहीनला मोठा झटका! PCB ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता आफ्रिदीची लक्षवेधी पोस्ट
6
Surbhi Chandna : "रोज रात्री रडायची..."; १३ वर्षे डेट केल्यावर अभिनेत्रीला लग्न केल्याचा पश्चाताप, झाली भावुक
7
२०१९ नंतर पहिल्यांदाच एका दिवसात Dmart च्या शेअरमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांना कसली भीती?
8
बाबा सिद्दिकीच नाही तर या नेत्यांच्या हत्यांनीही हादरली होती मुंबई, समोर आला होता अंडरवर्ल्डचा हात
9
“CMपदाच्या चेहऱ्यापेक्षा महाभ्रष्ट महायुती सरकार घालवणे महत्त्वाचे”: बाळासाहेब थोरात
10
Rohit Sharma Hardik Pandya, Mumbai Indians IPL 2025: हार्दिक पांड्या, रोहित शर्मा अन् मुंबई इंडियन्स... जयवर्धने हेड कोच होताच आकाश चोप्राची मोठी भविष्यवाणी
11
जेव्हा करीनाने बहिणीला पहिल्यांदा सांगितलं होतं सैफबद्दल, तेव्हा करिश्माने दिली होती ही रिअ‍ॅक्शन
12
Kojagiri Purnima 2024: कोजागरी विशेष 'हे' लक्ष्मी मंत्र; करतील कर्जमुक्त; वाचा हे विशेष तोडगे!
13
Raj Thackeray reaction, Toll Free in Mumbai: "सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
14
Kojagiri Purnima 2024: कोजागरी पौर्णिमेला का खेळला जातो महाभोंडला? हा केवळ खेळ आहे की पुजा? वाचा!
15
इमर्जिंग आशिया चषकासाठी Team India ची घोषणा; तिलककडे नेतृत्व, ऋतुराज गायकवाडला डच्चू
16
'या' योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना करू शकतं १५ लाखांची मदत; जाणून घ्या अर्ज कसा करावा?
17
प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती'ची कळी खुलेना? ३ दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
18
कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...
19
Reliance Jio नं लाँच केले २ नवे रिचार्ज प्लॅन्स; केवळ १ रुपयाचा फरक, कोणता आहे बेस्ट? 
20
स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या नाराजीनंतर मोठी घोषणा

धक्कादायक! प्रचंड मेहनत, अभ्यास, तरी ९४ टक्के गुण मिळवूनही ती झाली दहावीत नापास   

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 3:27 PM

10th Exam Result: दहावीच्या निकालांनंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका विद्यार्थिनीला दहावीच्या बोर्डामध्ये ९४ टक्के गुण मिळाले. मात्र त्यानंतरही ती नापास झाली.

उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे दहावीच्या निकालांनंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका विद्यार्थिनीला दहावीच्या बोर्डामध्ये ९४ टक्के गुण मिळाले. मात्र त्यानंतरही ती नापास झाली. यामध्ये उत्तर प्रदेश बोर्डाच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार भावना वर्मा या विद्यार्थिनीने ९४ टक्के गुण मिळवले होते. मात्र ती नापास असल्याचे जाहीर करण्यात आले. प्रॅक्टिकलमध्ये तिला १८० ऐवजी १८ गुण मिळाल्याने ती नापास झाली. उत्तर प्रदेश बोर्डाने जाहीर केलेल्या निकालानुसार तिला ४०२ गुण मिळाले. तर पाच विषयांच्या प्रॅक्टिकलमध्ये तिला प्रत्येकी केवळ ३ गुण मिळाले, या हिशेबाने एकूण १८ गुणच मिळाले.

आता शाळेच्या प्रशासनाने सांगितले की, सदर विद्यार्थिनी ही अभ्यासामध्ये खूप हुशार आहे. तसेच तिला शाळेने प्रॅक्टिकलमध्ये प्रत्येक विषयात ३० गुण दिले होते. मात्र बोर्डाच्या चुकीमुळे तिला प्रत्येक विषयामध्ये प्रत्येकी ३ गुण दिसत आहेत. या विद्यार्थिनीला प्रॅक्टिकलमध्ये दिलेले प्रत्येकी ३ गुण जोडले तर त्याची एकूण बेरीज ही ६०० पैकी ५६२ होते. त्यानुसार या विद्यार्थिनीला एकूण ९४ टक्के गुण मिळालेले आहेत. मात्र तरीही तिच्या गुणपत्रिकेमध्ये तिला नापास जाहीर करण्यात आलं आहे.

या निकालानंतर विद्यार्थिनीला मानसिक त्रास झाला आहे. तसेच ही विद्यार्थिनी आणि तिचे कुटुंबीया मुख्यमंत्र्यांकडे तपास करून न्याय देण्याची मागणी करत आहेत. सदर भावना वर्मा ही विद्यार्थिनी अमेठीमधील शिवप्रताप शिवप्रताप इंटर कॉलेजमध्ये शिक्षण घेते.  

टॅग्स :examपरीक्षाUttar Pradeshउत्तर प्रदेशEducationशिक्षण