शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरन नेगी यांचं निधन, २ नोव्हेंबरला केलं होतं अखेरचं मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 9:55 AM

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरन नेगी यांचं आज सकाळी निधन झालं. त्यांनी आतापर्यंत ३३ वेळा मतदान केलं आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरन नेगी यांचे आज सकाळी निधन झाले. हिमाचल प्रदेशातील किन्नौरचे रहिवासी असलेले नेगी 106 वर्षांचे होते. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी 2 नोव्हेंबर रोजी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केले होते.

देशातील सर्वात वयस्कर मतदार श्याम सरन नेगी नुकतेच रिटर्निंग ऑफिसरला 12-डी फॉर्म परत करून प्रसिद्धीझोतात आले. प्रत्यक्षात मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाचे फॉर्म परत केले होते. मात्र, त्याच दरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कल्पा येथील निवासस्थानी जाऊन पोस्टल मतदान घेतले. निवडणूक अधिकाऱ्यांनी 106 वर्षीय नेगी यांच्या घरातच पोस्टल बूथ तयार केला होता आणि त्यांच्यासाठी रेड कार्पेटही टाकले होते. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी आबिद हुसेन यांनी नेगी यांचा टोपी व मफलर देऊन सन्मान केला.

33 वेळा केले मतदानस्वतंत्र भारताचे पहिले मतदार म्हणून ओळखले जाणारे, नेगी यांना भारतीय लोकशाहीचे लिव्हिंग लेजेंडदेखील म्हटले जाते. आपल्या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी 33 वेळा मतदान केले. बॅलेट पेपरवरून ईव्हीएममध्ये बदल झाल्याचेही पाहिले. या विधानसभेसाठीही ते मतदानाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते.

1951 मध्ये पहिल्यांदा मतदान1 जुलै 1917 रोजी किन्नौर जिल्ह्यातील तत्कालीन चिन्नी आणि आता कल्पा या गावात जन्मलेले नेगी हे अनेकदा आठवण करून देत होते की, देशाने 1952 मध्ये स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत मतदान केले होते, परंतु किन्नौरसह तत्कालीन राज्य व्यवस्थेत 25 ऑक्टोबर 1951 रोजी हिमालयाच्या पर्वतीय भागात जास्त मतदान झाले. कारण भारताच्या इतर भागात फेब्रुवारी-मार्च 1952 मध्ये मतदान होणार होते. किन्नौर सारख्या जास्त हिमवर्षाव असलेल्या ठिकाणी हिवाळा आणि बर्फवृष्टी लक्षात घेऊन आधीच मतदान घेण्यात आले होते.

ऑक्टोबर 1951 मध्ये नेगी यांनी पहिल्यांदाच संसदीय निवडणुकीत मतदान केले. यानंतर त्यांनी एकाही निवडणुकीत आपला सहभाग सोडला नाही. मला माझ्या मताचे महत्त्व माहित आहे, असे नेगी म्हणायचे. शरीर साथ देत नसेल तर आत्मविश्वासाच्या जोरावर मी मतदानाला जात होतो. यावेळीही मतदानाचा अधिकार पूर्ण करणार आहे. या निवडणुकीत माझे हे शेवटचे मतदान असू शकते, अशी भीतीही त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.

असे ठरले पहिले मतदार"माझ्या गावाच्या शेजारच्या गावातल्या शाळेत निवडणुका घेण्यासाठी मी ड्युटीवर होतो. पण माझं मतदान माझ्या गावी, कल्पात होतं. मी आदल्या रात्री माझ्या घरी आलो होतो. पहाटेचे 4 वाजले होते. गोठवणारी थंडी असताना उठून तयार झालो. सकाळी 6 वाजता माझ्या मतदान केंद्रावर पोहोचलो. तेव्हा तिथे एकही मतदार नव्हता. मी अधिकाऱ्यांची वाट बघत होतो. ते आल्यावर मी त्यांना विनंती केली की मला लवकर मतदान करू द्या, कारण त्यानंतर मला शेजारच्या 9 किमी अंतरावर असलेल्या मुरंग गावात निवडणुका घेण्यासाठी जायचे होते. त्यांना माझी अडचण आणि उत्साह समजला. म्हणून त्यांनी मला नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी 6.30 वाजता मतदान करण्याची परवानगी दिली. अशा प्रकारे मी मतदानाचा हक्क बजावला आणि देशाचा पहिला मतदार ठरलो,” असे त्यांनी एकदा सांगितले होते.

टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूकIndiaभारत