शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
4
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
5
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
6
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
7
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
8
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
9
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
10
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
11
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
12
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
13
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
14
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
15
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
16
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
17
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
18
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
19
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

सावधान...! औषधांचे होताहेत साइड इफेक्ट; ५२ टक्के कुटुंबांतील लोकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 11:35 AM

सर्वेक्षणात ३४१ जिल्ह्यांतील जवळपास २२ हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते.

नवी दिल्ली : देशातील ५२ टक्के कुटुंबातील एक किंवा त्याहून अधिक सदस्यांना गेल्या पाच वर्षांत कोणत्या ना कोणत्या औषधाचे दुष्परिणाम (साइड इफेक्ट) जाणवले आहेत. ‘लोकल सर्कल्स’च्या राष्ट्रीय सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. सर्वेक्षणात ३४१ जिल्ह्यांतील जवळपास २२ हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. यात ६८ टक्के पुरुष आणि ३२ टक्के महिलांचा समावेश होता. 

सर्वेक्षणात सहभागी ३४ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना गेल्या पाच वर्षांत एक-दोन वेळा असा (औषधाचे दुष्परिणाम) अनुभव आला आहे. सहा टक्के लोकांना असा अनुभव दहाहून अधिक वेळा, तीन टक्के लोकांना सहा ते नऊ वेळा, तर नऊ टक्के लोकांना तीन ते पाच वेळा असा अनुभव आला. १८ टक्के लोकांना याबाबत निश्चितपणे सांगता आले नाही. 

असुरक्षित औषधे...गेल्या १२ महिन्यांत असुरक्षित औषधांची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. जुलैमध्ये केंद्रीय औषधे गुणवत्ता दर्जा नियंत्रण संघटनेला (सीडीएससीओ) औषधांचे ५१ बॅच दर्जाहीन असल्याचे आढळून आले होते. 

टॅग्स :Medicalवैद्यकीयIndiaभारत