शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'सॅल्यूट' इंडियन आर्मी... बर्फाळ प्रदेशात अडकेल्या 2500 पर्यटकांची सुखरुप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 10:12 IST

सिक्कीम म्हटलं की पर्यटन आलंच. त्यात, पावसाळ्यानंतर सगळीकडे हिरवळ पसरली असल्याने पर्यटकांचा जोर या मोसमात वाढतो.

नवी दिल्ली - सिक्किम येथील बर्फाच्छादित प्रदेशात अडकलेल्या 2500 नागरिकांची भारतीय सैन्याकडून सुटका करण्यात आली आहे. भारतीय सैन्याने सिक्कीममधील नाथू ला या बर्फाळ प्रदेशात अडकलेल्या पर्यंटकांना सुखरुपस्थळी पोहोचवले. नाथू ला आणि जवळील प्रदेशात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे पर्यटनासाठी आलेले हजारो पर्यटक येथे अडकून पडले होते. 

सिक्कीम म्हटलं की पर्यटन आलंच. त्यात, पावसाळ्यानंतर सगळीकडे हिरवळ पसरली असल्याने पर्यटकांचा जोर या मोसमात वाढतो. त्यामुळेच सिक्कीममध्येही पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. येथील नाथू ला दरी व जवळील प्रदेशात अनेक पुरुष पर्यंटकांसह महिला आणि लहानमुलेही अडकली होती. त्यावेळी, भारतीय जवानांनी जवळपास 2500 पर्यटकांना या बर्फवृष्टीपासून बचाव केला. अनेक पर्यटक या परिसरात आपल्या वाहनांसह अडकले होते. जवळपास 300 ते 400 वाहने या बर्फवृष्टीमध्ये अडकले होते. भारतीय सैन्याला याबाबतची सूचना मिळताच, लष्कराने मिशन बचाव हाती घेऊन सर्वांची सुखरुप सुटका केली. त्यानंतर, या सर्वच पर्यटकांना अन्न-पाणी, कपडे आणि औषधोपचार देण्यात आले. भारतीय सैन्याच्या या धाडसी कामगिरीमुळे पर्यटक भावूक बनले होते. तर, भारतीय सैन्याच्या आभार शब्दात मानता येणं शक्य नसल्याच्या भावनाही अनेकांनी बोलून दाखवल्या.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानsikkimसिक्किमSnowfallबर्फवृष्टी